सोमवार, १ डिसेंबर, २०१४

इंटरनेट एक व्यसन

आजच्या काळात सर्व सोयी सुविधा आपल्याला मिळाल्या आहेत.मानवाने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात फार प्रगती केली. इंटरनेटमुळे तर माहितीचा  विस्फोट होऊन जगाचे  द्वारच खुले झाले आहे. कोणत्याही व्यक्तीस कुठल्याही स्वरुपाची माहिती  इंटरनेटच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध झाली.इंटरनेटमुळे खऱ्या अर्थाने जग जवळ आले. भारतात आर्थिक उदारीकरणानंतर इंटरनेटचे जाळे वेगाने पसरले. या इंटरनेटच्या फायद्याप्रमाणे तोटेही आहेत. कोणत्याही गोष्टीचा वापर केला असता समतोल साधणे फार महत्वाचे आहे. त्याचा अतिरेक झाल्यास त्याचे दुष्परिणाम हे होणारच त्याप्रमाणे इंटरनेटचा जास्त वापर केल्यास त्याचे व्यसन लागू शकते.


       आजची तरुणाई हि फेसबुक वोट्सअपवर बिझी असते. या साईटचा वापर करताना  आसपासच्या जगाचे भानही त्यांना राहत नाही.इंटरनेटवर सर्वात जास्त बघितल्या जाणाऱ्या साईटमध्ये पोर्नोग्राफिक साईटसचा समावेश होतो. या  पोर्नोग्राफिक साईटसवरील व्हिडियो पाहून अनेकवेळा तरुण वाईट मार्गी जातात. तरुणांमध्ये विकृती वाढण्याच्या कारणांत इंटरनेटचा समावेश होतो. 
घरगुती इंटरनेटच्या वाढत्या प्रमाणामुळे 'इंटरनेट एडिक्शनअर्थात 'इंटरनेट'चे व्यसन लागण्याचे शहरातील मुलांचे प्रमाणही वाढले आहे. या व्यसनाधीनतेचा प्रत्यक्ष संबंध मेंदूमधील रसायनांचे प्रमाण बिघडण्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार 'इंटरनेट'चा वाढता वापर चिंतेत भर घालणारी बाब असूनकम्प्युटर अथवा तत्सम इंटरनेट पाहण्याच्या साधनांच्या प्रमाणाबाहेर वापराने चिडचिडअतिताण आदी विकार जडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. इंटरनेटचा इतका वापर तरुण मुले करतात कि आई वडिलांशी असलेला मुलांचा संवाद कमी होत आहे. इंटरनेटमुळे मुले मैदानी खेळ विसरले आहेत.

  इंटरनेट व्यसनात गुरफटलेली ही मुले  खऱ्या सामाजिक संवादापासून दुरावलेलीच राहातात. कौटुंबिक नातेसंबंधांवर परिणाम होतो. या सर्व सामाजिक एकलकोंडेपणाचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. वास्तवाशी/सत्याशी नातं तुटल्याने वा कमी झाल्याने ही मुलं सायकोसिस/स्किझोफ्रेनियाची बळी ठरू शकतात.कुमारवयीन तरुणांमधील आत्महत्या व त्यांच्यातील वाढती हिंसक वृत्ती या आजघडीच्या गंभीर समस्येलागढुळलेले कौटुंबिकसामाजिक स्तरावरले पदर जसे कारणीभूत आहेत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे कळत-नकळत होणारे दुष्परिणामही जबाबदार आहेत. इंटरनेट व्यसनाधीनता हे यातील एक महत्त्वाचं कारण!              


इंटरनेटचं व्यसन सोडवण्यासाठी मुक्तांगण


         जेव्हा कोणत्याही गोष्टीला भुलून त्याचा अतिरेक वापर केला जातोतेव्हा खरी त्या गोष्टीच्या व्यसनाची सुरवात होते. पण आजच्या जगात दारूतंबाखूचरसगांजा हेच फक्त व्यसन  राहील नाहीये. तर इंटरनेट ही व्यसनासारख वापरलं जावू लागलंय. अशाच इंटरनेट व्यसनी विद्यार्थीआणि मोठ्या व्यक्तींसाठी मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्रात इंटरनेट एडिक्शन सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातायेत.आजच प्रगत तंत्रज्ञान ज्या प्रमाणे आजच्या पिढीसाठी जगाच्या स्पर्धेत तारक आहे.तस्च ते त्यांच्यासाठी मारक बनत चालंल आहे. आजकाल टीव्हीकम्प्युटर यांचा वाढता वापर. त्यात तासंन तास इंटरनेटसोशल नेट वर्किंग साईट्सगेम्सपोर्न मुव्हीजचॅटीगमुळे ते सतत त्यातच गढून राहातायेत..त्यांच्या बोटांना आणि डोळ्याला तो एक चाळाच लागलाय.        

दिवसातला अर्ध्याहून अधिक वेळ ते या गोष्टींसाठी घालवतात आणि दारूतंबाखूचरस गांजा यांसारख या इंटरनेटचं व्यसन जडवून घेतायेत. सायबर कॅफेमध्ये जाऊन बसतात. कॉलेज शाळा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करायेत असं ही समोर येतंय. म्हणजेच या महाजालात ते स्वत:ला अडकून घेतायेत. आजच्या प्रगत समाजातली ही एक गंभीर समस्याच बनत चाललीये. याचसाठी आता अशा व्यक्तींना व्यसन मुक्ती केंद्राची मदत घ्यावी लागतेय.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केद्रात ही या वर्षभरात इंटरनेट एडीक्शनच्या ब-याच केसेस दाखल झाल्यात. यामध्ये १५ ते २२ वयोगटातील मुलं- मुलींच प्रमाण जास्त आहे.याच अजून एक कारण आहे ते नोकरदार आई वडील. ते घरात नसल्याने मुलांवर लक्ष ठेवल जात नाहीआणि मग परिणामी ते या व्यसनाच्या आहारी जातातअशा विद्यार्थ्यांवर उपचार कारण हेही एक चेलेंज आहे मुक्तांगण मध्ये आता या व्यसनावरही उपचार आता देण्यात येत आहेत.
त्यामुळेच आता ही पालकांचीच खरी कसोटी आहे कीआपल्या मुलाला. आजच्या या जीवघेण्या स्पर्धेत प्रगत. तंत्रज्ञानापासून दूर ठेवायचं तर नाही. पण त्याला याच सगळ्याचं व्यसनी ही बनवायचं नाही. एक सशक्त व्यक्ती म्हणून त्याला समाजात उभ करायचं.

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

पोइसरचा आठवडा बाजार

पोइसरचा आठवडा बाजार


बाजार हा शब्द कानावर येतो आणि आठवण येते गावच्या आठवडा बाजाराची. गावाकडे खूप पूर्वीपासून आठवड्यातून एकदा बाजार भरविण्याची पध्दत आहे. आमच्या गावी मंगळवारचा आठवडा बाजार भरविला जातो, त्यादिवसाला गावी वाढदिवस असेही  म्हणतात. सगळे जण या आठवडा बाजारात जाऊन काय ना काय खरेदी करतात. गावच्या बाजारात उगाचच फिरण्याचीही मजा काही औरच असते. पंचक्रोशीतील छोटे विक्रेते येथे येतात तसेच ग्राहकही येतात. बाजाराच्या दिवशी गावाला वेगळाच रंग चढलेला असतो. इकडे मुंबई शहरात मात्र  आठवडा बाजार भरणे हे विरळच असेल. कांदिवलीतील पोईसर येथे मात्र गेली अनेक वर्षे बुधवारचा बाजार भरतो.
       
     मुंबईही पूर्वी बांद्र्यापर्यंतच मर्यादित होती. त्यानंतरच्या काळात मुंबई उपनगरचा विकास झाला.याविकासामध्ये मुंबईतील मिठी, पोईसर, दहिसर नद्यांचे नाले झाले आणि त्याचा परिणाम २००५ मध्ये आलेल्या महापूरात दिसले. पोईसर नदीच्या म्हणजे नाल्याच्याजवळ हा बाजार भरविला जातो. अवर लेडी ही कांदिवलीतील जुनी शाळा आणि चर्चही तिथे आहे. या बाजारासाठी एक जागाच आरक्षित असली तरी ती जागा अपूरी पडत असल्याने अनेक लहान विक्रेते रस्त्यावर आपल दुकान मांडतात.  

     बाजारामध्ये भाजीपाला, फळे, लहान मोठ्या वस्तू(चमचे, सुरी, लहान भांडी, इत्यादी),खोटे दागदागिने, कपडे हे फार स्वस्त दरात मिळतात. पण पोईसरचा बाजार हा माशांसाठी प्रसिध्द आहे. हलवा,पापलेट या ताज्या माशांपासून जवला, बांगड्याच्या सुक्या माश्यापर्यंत सर्व मासे इथे मिळतात. ''ओ... दादा ओ.. मावशी आवर ये १०० ला जोरी घे'' असा कोळींणीचा आवाज गर्दीमध्ये येत असतो. त्यामुळे मासांहार करणाऱ्यांची इथे फार रेलचेल असते.  सुतळ, गोणी, टोपल्या, किचन्स, लहान मुलांसाठी स्वस्तातील चायना खेळणी अशा काही वस्तू आहेत जे कुठेही उपलब्ध नसतात ते फक्त या बाजारात मिळतात.
    
     वडापाव, कटलेट्स, भजीपाव यांचे छोटे स्टॉल बाजाराच्या मध्यातच असतात त्यामुळे बाजारात फिरताना आपले लक्ष तळलेल्या वड्यांकडे जाते आणि मग खाण्याचा मोह आवरता येत नाही. सध्या वडापावची किंमत साधारण १० ते १२ रुपये आहे. मात्र पोईसरच्या बाजारात एक वडापाव ७ ते ८ रुपयाला मिळतो.  बाजूलाच घुंगराचा खळ खळ करणारा उसाचा रसवाला असतो. १० ते १५ रुपयाला मिळणारा उसाचा रसही येथे फक्त ७ रुपयांमध्ये मिळतो. त्यामुळे बाजारात खरेदी करता करता पेटपूजाही होते ती ही स्वस्तात.
     
       पोईसरच्या बाजारामध्ये फिरण्यातच आपले तास, दोन तास कसे निघतात हेच कळत नाही सकाळी १० च्या सुमारास सुरु होणारा बाजार संध्याकाळी संपतो. बाजार जरी रोज भरत नसला तरी प्रत्येक ग्राहक आणि विक्रेत्याच्या मनात मात्र बाजारासाठी खास अशी जागा असते.आजच्या काळात मुंबईसारख्या शहरामध्ये वेगाने मॉल संस्कृती वाढत आहे. एकाच छताखाली सर्वकाही तेही एसीच्या हवेत असे जरी मॉलचे वैशिष्टय असले तरी प्रत्येकाला मॉलमधून वस्तू विकत घेणे परवडत नाही. अनेक अशा वस्तू ( किचंन्स, खोटे दागदागिने)आहेत त्यांची मॉलमध्ये कायच्या काय किंमत असते मात्र तिच वस्तू आठवडा बाजारात खूप स्वस्त मिळते. आठवडा बाजारात होणारी गर्दी ही मॉल्समधील ग्राहकांच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त असते.
     
     पोईसर आठवडा बाजाराचे चारकोप पोईसरवासियांच्या दृष्टीने वेगळे महत्व आहे. गेली कित्येक वर्ष हा बाजार सुरू असून दिवसेंदिवस या बाजारातील विक्रेत्यांची आणि ग्राहकांची संख्या वाढतच आहे. खुल्या आसमंतात  Fixed rate चा बोर्ड नसलेल्या विक्रेत्यांकडून वस्तूची खरेदी करण्यातही वेगळा अनुभव असतो. त्यामुळे जरी शहर कितीही झपाट्याने बदलले तरी पोईसरच्या आठवडा बाजाराचे महत्व कधीही कमी होणार नाही हे नक्की.


सोमवार, २४ नोव्हेंबर, २०१४

अमोल पालेकर - बातो ही बातों मे


                

काहीवेळा माझ अस होत की मी घऱातून कॉलेजसाठी लवकर निघतो ( बाकीच्यावेळी माझी तारेवरची कसरत म्हणजे धावपळीचाच कारभारच असतो)पण त्यावेळी बस उशीरा येते. आजही तेच झाल पण नशीब चांगल कारण रोजची ट्रेन मिळाली. ट्रेन मिळण्याचही  एक कारण  आहे ते म्हणजे आपल्या लोकल वेळेवर येत नाहीत आणि माझ्यासारख्यां उशीरा निघायची सवय असलेल्यांना ह्याचा फायदा होतो. विलेपार्ले स्टेशला उतरल्यावर कॉलेजला जाईपर्यंत एफ एम ऐकत असताना माझ्या आवडत्या अभिनेत्याचा वाढदिवस आहे हे कळल. हा अभिनेता आजच्यासारखा ६ पॅकवाला हिरो नाही.यानं चित्रपटात कधीही मारधाड केली नाही. यांच वैशिष्ट म्हणजे ते सामांन्यातील एक आहेत पडद्यावरही आणि खऱ्या आय़ुष्यातही त्यामुळेच ते सर्वांना आपल्यातले वाटतात. अभिनेते आणि तितकेच संवेदनशील दिग्दर्शक म्हणजे अमोल पालेकर यांनी आज ७१ वर्षात पदार्पण केले. अमोल पालेकर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.


        'अमोल पालेकर' हे नाव मी लहाणपणी ऐकल असेल पण ते कसे दिसतात त्यांचे चित्रपट कोणते हे मला १२ वी मध्ये कळल. टिव्हीवर त्यांच्या छोटी सी बात या चित्रपट काहीसा भाग मी पाहिला. त्यातील साधेपणा भावला आणि तो चित्रपट पूर्ण पाहता यावा यासाठी मी माझ्या अनेक मित्रांना विचारले पण त्यांच्याकडे हा चित्रपट मिळाला नाही. शेवटी काही दिवसानंतर इंटरनेटवर या चित्रपट मिळाला. परीक्षेसाठी जेमतेम आठवडा  बाकी असताना मी हा चित्रपट पूर्ण बघितला चित्रपटातील सांमान्य माणसाच्या प्रेमाची कथा अमोल पालेकर यांचा सहज सुंदर अभिनय. विद्या सिन्हांनी दिलेली साथ असरानी आणि अशोक कुमार यांची जुगलबंदी बासु चॅटर्जी यांच्या दिग्दर्शन ७० च्या दशकातील मुंबई यामुळे या चित्रपट मला प्रचंड आवडला.

    १२ वीच्या सुट्टीत गावी गेलो होतो. तेव्हा 'गोरी तेरा गाव बडा प्यारा' हे गाण एक काका गुणगुणत होते त्यावेळी मी त्यांनी मला सांगितल की हे गाण 'चितचोर' या चित्रपटातल आहे ते म्हणाले की ''मी मुंबईत असताना हा चित्रपट पाहिला होता अमोल पालेकरची अक्टींग मस्त आहे आणि गावातील कथा आहे''. त्याच्यां  सांगण्याने अमोल पालेकर यांच्या चित्रपटाविषयी मनात ओढ निर्माण झाली. त्यांचे चितचोर, गोलमाल, नरम गरम, रजनीगंधा हे चित्रपट पाहिल्यावर त्यांच्या नर्मविनोदी भुमिका आणि सहज सुंदर अभिनयामुळे अमोल पालेकरांचा मी दर्दी चाहता झालो. ते  माझे आवडते अभिनेते झाले. आजही त्यांचे चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहतो त्यामधील सामान्य माणसाशी जोडलेली नाळ आणि त्यांची अदाकारी प्रत्येकवेळी भारावते.

अमोल पालेकर यांची कारकिर्द

    जे जे स्कूल ऑफ आर्टसमध्ये त्यांनी फाइन आर्टस शिकले. चित्रकार असलेल्या अमोल पालेकर यांनी 'शांतता कोर्ट चालू आहे' या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २९ व्या वर्षी रजनीगंधा (१९७४) हा चित्रपट त्यांचा पहिला चित्रपट. दिनेश ठाकूर आणि विद्या सिन्हांच्या या चित्रपटामध्ये त्यांची भूमिकाही छाप पाडून जाते. त्यानंतर 'छोटी सी बात' सारखा सामांन्य माणसाच्या प्रेमावरील रंजक चित्रपट. चितचोरमधून शहरी तरुण आणि गावातील मुलींच प्रेमावर आधारित कथानक असलेल्या चित्रपट हे चित्रपट त्यांच्या सहज सुंदर अभिनयामुळे स्मरणीय ठरले.  

   अमोल पालेकर झरीना वहाब आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अभिनयामुळे गाजलेल्या घरोंदामध्ये शहरातील सामांन्य माणसाचा संघर्ष मांडला आहे. अमोल पालेकर यांनी काहीशी निगेटिव्ह व्यक्तिरेखा या चित्रपटात साकारली आहे. श्याम बेनेगल यांच्या 'भुमिका' (१९७७) चित्रपटामध्ये त्यांनी खलनायकी भुमिका साकारुन प्रेक्षकांना अचंबित करुन टाकले. बासु चॅटर्जी यांच्या बातो ही बातो में सारखा रेल्वेमध्ये होणाऱ्या प्रेम आणि बांद्र्यातील ख्रिश्चन कुटुंबावर आधारित चित्रपटामध्ये अमोल पालेकर-टीना मुनिम जोडी छान जमून आली.

    ह्रषिकेश मुखर्जींचा गोलमाल हा चित्रपट १९७९ मध्ये प्रदर्शित झाला आणि चित्रपटातील डबल रोलमुळे अमोल पालेकर खऱ्या अर्थाने एक स्टार झाले. या चित्रपटाची विनोदी कथा उत्पल दत्तअमोल पालेकरबिंद्या गोस्वामी यांमुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. रामप्रसाद शर्माभवानी शंकर ह्या व्यक्तीरेखा गाजल्या.  भारतीय चित्रपटातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये या समावेश होतो. या चित्रपटातील अभिनयामुळे अमोल पालेकर यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

     अपने परायेजुठीनरम गरमरंगबिरंगीटॅक्सी-टॅक्सी असे अनेक चित्रपट त्यांनी केले. एक अभिनेता म्हणून सिमित न राहता त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. १९८१ मध्ये आक्रीत हा त्यांचा दिग्दर्शन केलला पहिला चित्रपट होता. थोडासा रुमानी हो जाय हा कल्पनारंम्य चित्रपट लक्ष्यवेधी ठरला. या चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या बारिश व्यक्तिरेखेचे विशेष कौतुक केले गेल. बनगर वाडी, ध्यासपर्व असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट करुन दिग्दर्शनातही आपले वेगळेपण कायम राखले.२००५ मध्ये पहेली हा शाहरुख खानराणी मुखर्जी याच्यावरील चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात आले यामध्ये त्यांच्या दिग्दर्शन कौशल्याचे यश आहे. कच्ची धूपनकाबकरीना करीना अशा टिव्ही मालिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.

    अमोल पालेकर यांच्या चित्रपटातून सामांन्य माणसाच्या जीवन त्यातील संघर्षत्याच्या भावनाप्रेमत्याच्या ईच्छा आकांशा दाखविल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्या अक्शन चित्रपटांच्या काळात नर्मविनोदी चित्रपटांमुळे लोकांना आपलासा वाटणारा अभिनेता अशी ओळख त्यांनी निर्माण केली. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांमुळे माझी ह्रषिकेश मुखर्जीबासू चॅटर्जी यां प्रतिभावान दिग्दर्शकांची ओळख झाली. एक उत्तम अभिनेता दिग्दर्शक म्हणून ते परिचित असले तरी अनेक सामाजिक उपक्रमात ते सक्रिय सहभाग घेतात. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये आणि आम्हा चाहत्यांच्या ह्रद्यामध्ये त्यांना आदराचे स्थान आहे.



बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४

झोपाळा




मराठी रंगभूमीला भारतात मानाच स्थान आहे. प्रायोगिक नाटक ते व्यावसायिक नाटके यामध्ये संगीत नाटकांचा भाग वेगळाच. प्रायोगिक नाटकांचा मुळातच बाज वेगळा असतो कारण कोणतीही व्यावसायिक गणिते यामध्ये नसतात त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयांची हाताळणी यामध्ये केली जाते. अनेक प्रायोगिक नाटके नंतर व्यावसायिक नाटके होतात. काहीवेळा प्रायोगिक आणि व्यावसायिक असा सुरेख मेळ नाटकात साधण्यात येतो. झोपाळा हे नाटकही याच धऱतीवरील आहे. झोपळा हा शब्द ऐकल्यावर नॉस्टलेजिक व्हायला होत कारण प्रत्येकाने झोपाळ्यावर झोका घेतलेला असतो त्या झोक्यात आपल्याला उंचावरुन झुर् खाली यायला होत तसंच हे झोपाळा नाटक.
मराठी लेखकांमध्ये स्वतची वेगळी ओळख निर्माण केलेले दोन लेखक म्हणजे व.पू, काळे आणि रत्नाकर मतकरी. झोपाळा या विषयावर या दोघांनीही कथा लिहिली आहे, व.पू.च लेखन म्हणजे माणसाला प्रश्नार्थक करणार आणि मतकरीच्या लेखनात गुढता भरलेली अशी दोन्ही कथांवर आधारित नाटक म्हणजे झोपाळा.

प्रथमेश परब, भाग्यश्री शंकपाल  (बालक पालक फेम ) आणि डहाणुकर महाविद्यालयातील मुलांनी झोपाळा साकारले आहे.  नाटकाची सुरुवातच एका कार्यालयातून होते. कार्यालयातील जेष्ठ कर्मचारी (प्रथमेश परब) हा या कथा सांगतो. त्याच्याच कार्यालयात स्टॅनो म्हणून काम करत असणाऱ्या ललितबद्दल ही कथा असते. ललित सोबत त्या दिवशी एक उच्चभ्रू स्त्री कार्यालयापर्यंत येते. आणि मग सुत्रधार त्याला विचारतो की ही स्त्री कोण  ललित आपल्या बालपण आणि मृदुला भाग्यश्री शंकपाल हीच शेजारी गावी राहण. झोपाळ्यावर झोका घेणे. पुढे मात्र मृदुलाचा जीवनात संबंध नसणे आणि आता पुन्हा मृदुलाची भेठ होते. कॉलेजमधील खास मैत्रीण आणि ललितला भावलेली जसवंतीही त्याच्या आयुष्यात पुन्हा येते. अशा घटना एकाच वेळा घडतात आणि सर्व  या कथेचा शेवट शेवटी प्रश्नार्थक होतो.
मध्यंतरानंतर दुसरी कथा सुरु होते. नाशकात राहणाऱ्या लिलूला लग्नासाठी मुलाकडचे पाहण्यास येतात. त्यावेळी त्या मुलाची आई जणूकाही या वाड्यात वास्तव्य करते असे प्रश्न विचारते त्यामुळे सर्वजण कोड्यात पडतात. त्यांच्या घरातील झोपाळ्यावर बसून ती यासर्व गुढतेची उत्तर देते. कुसुमचं लग्न हे मुलीच्या वडीलांशी ठरलेल असते. मुलाकडच्यांवर गंभीर प्रसंग येऊन दोनवेळा लग्नाचा मुहुर्त पुढे जातो त्यामुळे हे लग्न शेवटी मोडते. मात्र कुसुमचे मन मात्र नाशकातील वाड्यातच अडकलेला असतो अशी मतकरीची रहस्यमय कथा आहे.
नाटकातील दोन्ही कथा वेगळ्या असल्या तरी झोपाळ्याशी निगडीत आहेत. पहिली कथा ही मनाचा ठाव घेते. व.पू. काळे यांची ही कथा योग्य पद्धतीने साकारली गेली आहे. कलाकारांनी अभिनय ही चांगला केला आहे. नाटकातील दोन्ही कथांमध्ये प्रकाशयोजनाचे वापर फार अप्रतिम केला आहे. प्रकाशयोजनेमुळे नाटकाला वेगळे स्वरुप प्राप्त झाले आहे. सर्व दारातील झोपाळ्याचा प्रसंग हा प्रेक्षकाला अचंबित करतो. नाटकातील संगीतही साजेस आहे.
मध्यंतरानंतर दुसऱ्या कथेची सुरुवात फार गुढ होते. आपोआप झोपाळा हलणे, कुसुमचे विचित्र वागणे यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात परंतु वारंवार येणारे तेच प्रसंगामुळे कथा कंटाळवाणी होते. तरीही या कथेमध्येही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे मात्र कथा योग्य पध्दतीने मांडली गेली नाही असेच वाटते. रत्नाकर मतकरींची कथा ज्याप्रमाणे गुढ असावी अशी ती वाटत नाही.
दोन्ही कथा मांडण्याचा प्रयत्न चांगला केला असला तरी दुसरी कथा फारशी जुळून येत नाही त्यामुळे पहिली कथा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. नाटकाच नैपथ्य ही कथेला साजेस आहे. एकंदर झोपाळा हे नाटकाची मांडणी वेगळी आहे. विषयहिन हिंदी चित्रपटांना पैसे घालण्यापेक्षा झोपाळा नाटक तुम्हाला नक्कीच तुम्हाला वेगळा अनुभव देऊन जाईल.



गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

वाढता कौटुंबिक विसंवाद


 


                 आजकाल सगळीकडे आपण ऐकतो कि लोकांना सतत कसल्या ना कसल्या गोष्टीची चिंता सतावत असते. मनावर कसला ना कसला ताण असतोच. टेंन्शन हा शब्द तर जीवनातील अविभाज्य घटकच बनला आहे. आमच्या शेजारी राहणाऱ्या पहिलीतल्या मुलीशी सहज गप्पा मारत असताना ती मला म्हणाली की मला अभ्यासाच टेंन्शन आल आहे. त्यावेळी मी आवाक झालो. आजच्या घडीला पहिलीतील मुलीलाही टेंन्शन येत आहे ज्या वयात खेळायचे असते त्या वयात मुलांना कसल टेंन्शन येत. त्यात त्या मुलांचीही चूक नाही घरी आई वडील कामावर जात असल्याने मुलांना शाळा आणि त्यानंतर क्लासमध्ये जाव लागत त्यामध्ये शाळेचा अभ्यास, क्लासचा अभ्यास वेळ मिळालाच तर त्यावेळात मुले टॅब, मोबाईलवरील गॅम्स खेळण्यात व्यस्त असतात. यामध्ये मुले आणि पालकांचा संवादच होत नाहीत. मुले आणि पालक ही विसंवादाचे एक उदाहरण झाले खऱतर कौटुंबिक विसंवाद ही आजच्या धावपळीच्या जगात मुख्य समस्या बनली आहे. 


                      आताचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे.आज मोबाईल, इंटरनेट आणि इतर साधनांमध्ये आपण  इतके दंग झाला आहे की माणसे घऱात एकत्र बसली असली तरी त्यांची लक्ष मोबाईल मध्ये असते. त्यामुळे फेसबुक, व्हॅाटसप सारख्या संवादमाध्यमांचा  ५ वर्षाच्या लहान मुलापासून ते ७० वर्षांच्या आजोबांपर्य़ंत सर्व याचा सर्रास वापर करत आहेत.यामध्येच प्रत्येक जण व्यस्त असतो की इतर गोष्टींना त्याच्याकडे वेळच उरत नाही. हे इंटरनेटचे व्यसन कौटुंबिक विसंवादाचे मुख्य कारण आहे.

घर असावे सुंदर माझे असे सर्वांनाच वाटते परंतु आता घरात घरपण राहिले नसुन फक्त चार भिंती आहेत. ज्या भिंतीमध्ये  घरच्यांच्या आयुष्यात काय चालू आहे याची कल्पनाही बहुतेक जणांना नसते. घरातल्या लोंकाशी बोलणेच होत नसल्याने आपले पणाचा ओलावा उरत नाही. कोणा विषयी आदर राहत नाही.  प्रत्येक जण आपल्यापूरती विचार करतो. त्यामुळे माणूस राहण्यासाठी म्हणून राहत आहे अशा चार भिंतींना घऱ म्हणावे का हाच प्रश्न पडतो.


         काही वर्षांपूर्वी 'श्रीयुत गंगाधऱ टिपरे ही मालिका येत असे. ही मालिका इतर मालिंकापेक्षा फार वेगळी होती. यात शिऱ्या आणि त्याच्या आजोबांचे नाते, आई वडील शेखर, शामला यांच्या नात्यातील ओलावा घऱातील वेगवेगळ्या समस्या रंजकरित्या सोडविल्या जात. कुटुंबाचे महत्व या मालिकेतून मांडले गेले होते. त्यामुळे ही मालिका लोकांच्या दिर्घकाल स्मरणात राहिली आहे. आज त्याप्रकारच्या मालिकाही येत नाही आणि चित्रपटही नाहीत. प्रत्यक्षातही लोकांचा दुष्टीकोन बदलला आहे हे महत्वाचे आहे.आज आजीच्या गोष्टी ऐकण्यात नातवाला रस नसतो. मोबाईल,टॅबवरील गेम्ससारख्या आभासी विश्वातच लहान मुले रमत आहेत. यामुळे नातेसंबधातील दरी वाढत जात आहे. 
          कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अतिरेकही घातक असतो. इंटरनेटचाही अतिवापर हा माणसाला घातक ठरु लागला आहे. इंटरनेटमुळे जग जवळ आले असले तरी आपली माणसे दुरावली आहेत. माणूस आभासी जगात वावरु लागला आहे. प्रत्यक्ष संवादाला माणसाच्या जीवनातील स्थान कमी होऊ लागल्यानेच अनेकांना मानसिक आजार होत आहेत. कौटुंबिक विसंवादातूनच या सर्व समस्या होत आहेत हे मान्य करावच लागेल.
         काळ बदलतो तसे माणसालाही बदलावे लागते  त्यामुळे कुटुंबातील नातेसंबधामध्येही काळानुसार बदल  होत आहे. मात्र  कुटुंबातील व्यक्तींचे आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान असलेच पाहिजे. आपल्या वैयक्तिक जीवनातील समस्या जर आपण घऱच्यांसमोर मांडल्यास तर समस्येचे निराकरण होऊ शकते. काहीवेळा समस्येवर तोडगा निघाला नसला तरी जो हवा असणारा भावनिक पाठिंबा आपल्याला कुटुंबाकडून नक्कीच मिळतो. या पाठिंबाची आपल्याला खरी गरज असते.
         माणसाने कुटुंब आणि नातेसंबधावर लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर माणसाची अवस्था भरकटलेल्या जहाजाप्रमाणे होईल.  पौराणिक काळापासून आपल्या देशात कुंटुंबाला महत्व दिले आहे. कुटुंबाच्या संस्कारावर माणूस घडतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परस्परांशी नियमित संवाद ठेवणे प्रत्येक कुटुंबाने महत्त्वाचे मानले तर कौटुंबिक विसंवादाचे प्रमाण नक्कीच कमी होईल.








गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४

महाराष्ट्रातील रणसंग्राम

                                        




        महाराष्ट्रामध्ये काल मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. गेली १५ दिवस प्रचाराचा धुरळा महाराष्ट्रभर उडला होता. दिल्ली पासून गल्लीपर्यंत सर्व राजकीय पुढारी या निवडणूकीत कार्य़रत होते. गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस याच्या भष्टाचारी कारभारामुळे जनतेमध्ये त्यांच्याविरुध्द असंतोष होता त्यामुळे या निवडणूकीत भाजप शिवसेनेच्या बाजूने जनतेचा कौल होता हे लोकसभेतील महायुतीच्या अभुतपूर्व यशाने स्पष्ट झाले होते. भाजप शिवसेना यांच्यात जागावाटपावरुन अनेक दिवस वादावादी सुरु होती. अखेर भाजपाने शिवसेनेशी काडीमोड घेत तब्बल २५ वर्षापासुन असलेली ही युती संपुष्टात आली. त्यानंतर काही क्षणातच राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीतून बाहेर पडून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भुकंप घडवून आणला. महाराष्ट्राने गेली काही वर्षे पाहिलेली आघाडी आणि युतीचे राजकारण एका दिवसामध्ये पालटले. मनसेही शहरी भागात यश मिळवू शकत असल्याने महाराष्ट्रातमध्ये पहिल्यांदाच पंचरंगी निवडणुका झाल्या.

गरज सरो वैद्य मरो
          वरील म्हणीप्रमाणे महाराष्ट्रातील राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भुमिका घेतली. २५ वर्षे हिंदुत्वाच्या मुद्दावर एकत्र असणारे भाजप शिवसेना या पक्षांमध्ये अनेकदा वाद झाले परंतु युतीत कधी बेबनाव दिसला नव्हता मात्र लोकसभेतील एकहाती सत्तेनंतर भाजपाने शिवसेनेला दिलेले कमी महत्वाचे मंत्रीपद वारंवार दिलेली कमीपणाची वागणूक यामुळे शिवसेना अस्वस्थ होती. नरेंद्र मोदीची लाट असल्याने भाजपाने शिवसेनेकडे विधानसभेसाठी जास्त जागांची मागणी केली अवाजवी जागा मागितल्याने शिवसेनेनेही त्या मागणीस विरोध केला. त्यानंतर चर्चेचे गुऱ्हाळ अनेक दिवस सुरु होत आणि शेवटी भाजपाने शिवसेनेशी युती तोडली ज्या भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे बोट धरुन पाय रोवले त्यांनी आता शिवसेनेलाच दुर सारले आहे.
        राष्ट्रवादी काँग्रेसनेही गेली १५ वर्षे काँग्रेसबरोबर राज्यकारभार केला मात्र लोकसभेतील पराभव आणि जनतेमधील असंतोषाची भावना यामुळे काँग्रेसला टार्गेट करत आघाडीतून बाहेर पडत वेगळा रस्ता धरला. जरी आम्ही सत्तेत होतो तरी आम्ही विकासाचाच प्रयत्न केला मात्र काँग्रेसमुळेच राज्याचा विकास होऊ शकला नाही असा प्रचार राष्ट्रवादीला यामुळे करता आला यावरुनच राष्ट्रवादीचा संधीसाधुपणा दिसुन येतो.


प्रचाराची रणधुमाळी
           प्रचारातही राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेख केली. कोणी अफजलखानाच्या फौजा, पहाड का चुहा, अर्धे चड्डीवाले अशी खालच्या दर्जाची टिका या निवडणूकीत झाली. शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट, मनसेची ब्लू प्रिंट भाजपाचे दृष्टीपत्र आणि काँग्रेस, ऱाष्ट्रवादीने जाहीरनामा काढुन जनतेला आश्वासन दिले खरे मात्र यावर चर्चा न होता एकमेकांची उणीधुणी काढण्यातच राजकीय पक्ष मग्न होते. आठवलेंच्या कविता आणि राज ठाकरेंच त्यास प्रत्युत्तर देण यातही जनतेच राजकीय मनोरंजनच झाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षरश पुर्ण महाराष्ट्र पिंजुन काढला. अमेरिकेचा दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी गेले १५ दिवस महाराष्ट्रातच मुक्कामाला होते. एखाद्या पंतप्रधानाने विधानसभेसाठी तब्बल २७ सभा घेणे हे इतिहासात प्रथमच होत होते.  प्रदेश भाजपने जणू नरेंद्र मोदी नामाचा जपच केला. सीमेवरील गोळीबार हुडहुड वादळ अशा राष्ट्रीय समस्यांवरुन इतर पक्षांनी पंतप्रधानांवर जोरदार टिका केली.
         शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असल्याने आणि त्यातच भाजपाने युती तोडल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे याच्यासाठी ही निवडणुक म्हणजे राजकीय कसोटीच आहे. प्रचारासाठी उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले. भाजपाविषयी असलेला असंतोष त्यानी प्रचारातुन व्यक्त करत भाजपालाच क्रमांक एकचा शत्रु मानले. या निवडणुकीत मोदी लाट थोपवून महाराष्ट्रात शिवसेना भाजपपेक्षा वरचढ असावी हेच त्यांच्यासमोरील मुख्य ध्येय आहे.
लोकसभेतील पराभवातून काँग्रेस, राष्ट्रवादी अजून सावरले नाहीत असेच या दोन्ही पक्षांच्या प्रचारातून दिसून येत होते. पराभवाची मानसिकताच घेऊन हे पक्ष निवडणूकीत उतरले आहेत असे नेत्यांच्या देहबोलीतून दिसून येत होते. महाराष्ट्राचे राजकारणावर पकड असलेले शरद पवारही निवडणूकीनंतरच्या बेरजेच्या राजकारणात राष्ट्रवादी किंगमेकर ठरु शकते याकडे लक्ष ठेऊन आहेत असे त्यांच्या भाजप शिवसेनेसंबधी विधानातून स्पष्ट होत होते. राज ठाकरेंच्या सभेला गर्दी मोठ्या प्रमाणात होत होती तरी ही गर्दी मतांमध्ये किती परावर्तित होईल यावरच मनसेची राजकीय घौडदौड अवलंबून आहे.

धक्कादायक निकालांची शक्यता
       पंचरंगी निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनां उमेदवार उभे करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. या निवडणूकीत राजकीय पक्षांना कोण किती पाण्यात आहे याचा अंदाजही येईल. जनेतेलाही युती आणि आघाडीचे सरकार न देता कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता देण्याची संधी लाभली आहे. जनतेचा कौल मतपेटीत बंद झाला आहेत. अनेक सर्वेक्षणातून भाजप एकहाती सत्ता मिळवले असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. माध्यमांच्या सर्वेक्षण हे तंतोतंत खरे ठरेल असे नाही कारण पंचरंगी निवडणूका असल्याने प्रत्येक मतदारसंघात चुरशीच्या लढती होत आहेत आणि जिंकून येणाऱ्या उमेदवारचे मताधिक्य हे फार थोड असेल त्यामुळे आताही अंदाज बांधणे कठीण आहे. कल जरी भाजप शिवसेनेच्या बाजूने असला तरी राज्यात अनेक धक्कादायक निकालांची शक्यता आहे आणि अनेक भाकित या निवडणूकीत खोटी ठरतील असे मला वाटते. आता फक्त १९ तारखेचीच प्रत्येकाला आस लागली आहे. बघुया भविष्यात काय दडले आहे ते...

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

भारतीय हॉकीला नवसंजीवनी


           गेल्या शनिवारी इन्चॉन आशियाई खेळांची सांगता झाली. या स्पर्धेत चीनने नेहमीप्रमाणे आपले वर्चस्व कायम राखत ३५० पदकांची कमाई केली. जपान, यजमान दक्षिण कोरिया या देशांनीही स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. भारताने ११ सुवर्णासहित ५७ पदकांची कमाई केली. गेल्या आशियाई खेळांच्या तुलनेत ही कामगिरी कमी असली तरी या स्पर्धेतून अनेक नवे क्रिडापटूं भारतास मिळाले, कबड्डी, नेमबाजी, टेनिस,अॅथलेटिक्स या खेळांमध्ये खेळाडूंनी साजेशी कामगिरी केली . मात्र काही क्रिडा प्रकारात खेळाडूंना अपयशाचा सामना करावा लागला. या आशियाई खेळांमुळे स्कॉश. तिरंदाजीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आपला ठसा उमठवला. या खेळामध्ये वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला पराभूत करत  सुवर्णपदक जिंकत  खऱ्या अर्थाने हॉकीला नवसंजीवनी दिली आहे त्यामुळेच या य़शाच महत्व वेगळ आहे. ह़़ॉकी संघाने १६ वर्षानंतर सुवर्णपदक जिकले आणि २०१६ अॉलिम्पिक खेळांमध्ये प्रवेशही निश्चित केला.
         भारतीय ह़़ॉकी संघावर खराब कामगिरीमुळे नेहमीच टीका केली जात होती. राष्ट्रीय ह़ॉकी संघटनेमध्ये असणारे वाद, ह़़ॉकी हा भारताचा  राष्ट्रीय खेळ असूनही सरकार दरबारी ह़ॉकी खेळाप्रती असलेली उदासिनता, यामुळे भारतीय ह़ॉकी संपली असेच वाटत होते. या पार्श्वभूमीवर भारतीय हॉकी संघाने आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.   प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी कामगिरी  हॉकीपटूंनी केली आहे.

         अाशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकू असा आत्मविश्वास स्पर्धेपूर्वीच हॉकीपटूंनी वक्त केला होता आणि त्यानी तो सार्थ ठरवला. सरदार सिंग याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अाशियाई स्पर्धेत उपांत्यफेरीत दक्षिण कोरियाचं अाव्हान १-० असे परतवले. साखळी सामन्यात पाकिस्तान विरुध्द भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी अंतिम सामन्यात भारताला मिळाली होती आणि या संधीचे सोने करत हॉकी संघाने सुवर्णपदकावर मोहोर उमटविली. अनुभवी सरदार सिंग, गोलकिपर श्रीजेश, बिरेंदर लाक्रा, रघुनाथ  अाणि नव्या दमाचे अाकाशदिप सिंग,मनप्रीत सिंग, कोठाजित सिंग यांची या स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनिय होती एकंदर गेल्या काही वर्षापासून  पूर्ण हॉकी संघच फार मेहनत करत आहे या मेहनतीचे फळ हे आशियाई खेळामध्ये मिळाले,
        भारतीय हॉकीचा इतिहासच गौरवशाली आहे.हॉकीचे जादुगर ध्यानंचंद यानी हॉकीला खरा सुवर्णकाळ मिळवून दिला.  तब्बल ८ वेळा आलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी हॉकी संघाने केली आहे. अॉलंम्पिकमध्ये भारत आणि हॉकीचे सुवर्णपदक हे जणू समीकरणच होत. १९७५ मध्ये मलेशियात अजितपाल सिंग याच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकत हॉकीला यशोशिखर मिळवून दिले. लहान लहान पास अाणि खेळातील प्रचंड वेग हे भारतीय हॉकीची वैशिष्टय होती.   १९८० पर्य़ंत भारतीय हॉकीचा दबदबा होता. भारतीयांमध्ये हॉकी सर्वात लोकप्रिय खेळ होता.
        १९८२ मध्ये दिल्ली येथे आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळामध्ये भारत आणि पाकिस्तान असा अंतिम सामना रंगला त्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानने भारताला ७-१ ने हरवून जणू भारतीय हॉकीचा धज्जा उ़डविला. या मानहानिकारक पराभवामुळे भारतीय हॉकीची लोकप्रियता प्रचंड घसरली, हॉकी संघावर प्रचंड टिका झाली या पार्श्वभुमीवर आधारित चक दे इंडिया हा चित्रपट आहे. त्यावेळीचे गोलकिपर मीररंजन नेगी यांची भुमिका शाहरुख खानने साकारली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला त्यामुळे क्रिडारसिंकाना क्रिकेटने आकर्षित केले आणि खऱ्या अर्थाने भारतीय हॉकीला उतरती कळा लागली.
      त्यानंतर हॉकीमध्ये भारताची कामगिरी खालावतच गेली. त्यात  ह़ॉकीचा चेहरामोहरा बदलला हॉकी अस्ट्रोटर्फ मैदानावर खेळली जाऊ लागली त्यामुळे अनेक युरोपियन देशांनी या नव्या हॉकीशी जुळवून घेतले मात्र भारतीय हॉकीचा पायाच मुळात मैदानावर असल्याने भारतीय हॉकी या नव्या हॉकीशी लवकर समरस झाली नाही. ९०च्या दशकात धनराज पिल्लेंच्या रुपाने भारतीय हॉकीला नवा स्टार मिळाला. धनराज पिल्लेंच्या नेतृत्वाखाली हॉकीला पुन्हा चांगले दिवस येत असतानाच हॉकी प्रशासनाने राजकारण करीत धनराज पिल्लेसारख्या खेळाडूचे करियरच संपविले. २००८ च्या बिजींग अॉलंम्पिकमध्ये भारत प्रवेशही करु शकला नाही याघटनेमुळे भारतीय हॉकीचं संपली अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांतून येऊ लागली.

         गेल्या दोन-तीन वर्षात भारतीय हॉकी संघाने चांगली कामगिरी केली आहे. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक, आशियाई चषकातील उपविजेतेपद अाणि आता आशियाई  खेळांमध्ये सुवर्णपदकासहित अ़ॉलंम्पिक प्रवेश यामुळे भारतीय हॉकीला पुन्हा चांगले दिवस येत आहेत. य़ा भारतीय संघाक़डून लोकांना फार अपेक्षा आहेत.  कारण हॉकीशी भारतीयांचे भावनिक नाते आहे कितीही झाले तरी लोक हॉकी खेळांमध्य भारतीयांना आपलेपण वाटते. भारतातील हॉकीचे चाहते हे दर्दी आहेत. भारतीय हॉकीचे गतवैभव मिळवून देऊ असा विश्वास आताच्या संघात आहे. या यशाने हुरळून न जाता दोन वर्षानंतर येणाऱ्या अॉलंम्पिकसाठी योग्य नियोजनपूर्वक प्रयत्न आतापासून सुरु करायला हवेत. भारतीय ह़ॉकी आणि युरोपियन हॉकीचा ताळमेळ घालता गेला तर् नक्कीच हा भारतीय संघ २०१६ रियो अॉलंम्पिकमध्ये चांगली कामगिरी करेल आणि भारतीय हॉकीला गतवैभव प्राप्त करुन देईल यात शंका नाही


शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

विजयीभव:



       आजपासून दक्षिण कोरियातील इन्चॉन येथे आशियाई क्रिडा स्पर्धेस सुरुवात होत आहे. आशिया खंडातील ४५ देश या स्पर्धेत सामील होणार आहेत. ऑलंम्पिकनंतर महत्वाची स्पर्धा म्हणून आशियाई स्पर्धेकडे पाहिले जाते. १९५१ साली दिल्ली येथे पहिली आशियाई स्पर्धा पार पडली. इन्चॉन येथे होणारी ही १७ वी आशियाई स्पर्धा आहे. भारतातर्फे या स्पर्धेत ६८९ जणांचा चमू पाठविण्यात आला आहे. ३६ विविध खेळांमध्ये भारत सहभागी होणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक असणार आहे हॉकी संघाचा कप्तान सरदार सिंग. ही हॉकीसाठी अभिमानाची बाब आहे.
       या स्पर्धेत प्रामुख्याने नेमबाजी, अॅथलेटिक्स, तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्ती कबड्डी आणि हॉकी या खेळामध्ये भारताला पदकांची आशा आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत जितू राय, अभिनव बिंद्रा,राही सरनोबत यांनी सुवर्णवेध घेतला होता त्यांच्याकडून याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. आशियाई स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये भारताने नेहमीच पदकांची लयलुट केली आहे. २०१० ग्वांझाऊ आशियाई स्पर्धेत भारतीय अॅथलिटसनी ५ सुवर्णासहित अनेक पदके मिळवली होती यावेळी या पदकांमध्ये वाढ होइल व्हावी. तिरंदाजीत दिपिका कुमारी आणि इतर खेळाडू सुवर्णवेध करण्यास आतूर आहे. बॅडमिंटनमध्ये सायना,सिंधु आणि पी. कश्यपकडून पदकाची अपेक्षा आहे. स्टार बॉक्सर विजेंदर सिग याच्या अनुपस्थित बॉक्सिंगपटूही ग्लोडन पंच देण्यास उत्सुक आहे. सुशील कुमार याने या स्पर्धेत माघार घेतली असली तरी योगेश्वर दत्तसह इतर कुश्तीपटू चीतपट करुन  सुशील कुमारची कमी जाणवू देणार नाही. स्कॉशमध्ये जोश्ना,दिपिका पल्लीकली याचां राष्ट्रकुलमधील सुवर्ण कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा मानस आहे. 
        प्रो कबड्डीमुळे कबड्डीला नवसंजीवनी मिळाली त्यामुळे या स्पर्धेत सुवर्ण जिंकू असा कबड्डीपटूंचा विश्वास आहे. कबड्डीमध्ये विशेष म्हणजे भारताने आशियाई स्पर्धेत सुवर्णच कामगिरी केली आहे. हॉकीमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकविणारच आणि २०१६ च्या रियो ऑलंम्पिकचे टिकीट निश्चित करणार असा चंग हॉकी खेळाडूंनी बांधला आहे. महिला हॉकीकडूनही पदकाची अपेक्षा आहे.  स्टार टेनिसपटूंच्या गैरहजरीतही सानियाकडून पदकाची आस आहे. रोईंग, गोल्फ, बिलियर्ड या खेळांतूही भारतास पदक मिळू शकतात.
        स्पर्धेचा इतिहास पाहता चीन,जपान आणि दक्षिण कोरियाचे पदक तालिकेवर वर्चस्व असते. भारत पहिल्या दहामध्ये स्थान असते यावेळी मात्र एकंदर या स्पर्धेत पदकांची लयलूट करुन भारताने २०१४चे एशियाड गाजवावे  आणि पदकतालिकेत पहिल्या पाचात येऊन क्रिडा क्षेत्रात नवा अध्याय लिहावा हीच सामांन्य क्रिडा रसिकांची आशा आहे. तर चला या पुढील १५ दिवस या स्पर्धेचा आनंद लुटुया आणि खेळाडूंना प्रोत्साहित करुया... 

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४

'पोश्टर बॉइज्' एक इरसाल ईनोदी सिनेमा





पोश्टर बॉइज् हा चित्रपट गेल्या आठवड्यात मित्रांसोबत पाहिला. वेगळा विषय आणि दमदार कलाकार यामुळे हा चित्रपट पाहण्यसाठी चित्रपटगृहात गेलो. चित्रपटाची विषय मुळातच नसबंदी सारख्या गंभीर विषयावर असला तरी दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या समीर पाटील यांनी या विषयाला रंजक आणि विनोदी पद्धतीने सादर केला आहे. नसबंदीवर विनोद करताना तो विनोद कमरे खालचा होऊ न देता विनोदाची सीमारेषा जपली आहे याचे श्रेय लेखक आणि दिग्दर्शकाला द्यावे लागेल. चित्रपटाची कथा एका गावातील जत्रेत सुरु होते. या जत्रेच्या आनंदानंतर गावचे प्रतिष्ठित गृहस्थ जगन देशमुख ( दिलीप प्रभावळकर), शाळा मास्तर सदानंद कुलकर्णी ( ऋषिकेश जोशी) आणि गावातला एक अवली तरुण अर्जुन जगताप(अनिकेत विश्वासराव) यांच्यावर जणु काही आभाळच कोसळते. जगन देशमुखांच्या मुलीचा साखरपुडा मोडतो, सदानंद कुलकर्णींची बायको घर सोडून जाते आणि अर्जुनचे लग्न मोडते. ही आफत कशामुळे ओढवली आहे याचा थांगपत्ता या तिघांनाही नसतो. ते या प्रकरणाचा शोध घेतात तेव्हा त्यांना धक्का बसतो की त्यांचे फोटो सरकारच्या बिनटाका नसबंदीच्या पोश्टरवर त्यांना न विचारता लावण्यात येतात. यानंतर हे तिघे कशाप्रकारे लढा देतात याची गमतीशीर गोष्ट म्हणजे पोश्टर बॉइज्.
       कुलकर्णी मास्तर मुलांना त्सुनामी शिकवत असताना त्यांची बायको शाळेत येऊन मी घर सोडते आहे असे सांगते हा प्रसंग तसेच जगन आबा एका मातारीला आजीबाई म्हणतात तेव्हाचा प्रसंग अशा  कथेतील विनोदाच्या पेरणीमुळे चित्रपट पाहताना आपल्याला कंटाळा येत नाही. दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी यांनी दर्जेदार अभिनय केला आहे. या चित्रपटात सरप्राइज पॅकेज ठरला आहे तो अनिकेत विश्वासराव. गावातील अवली पण तितकाच हळव्या मनाचा तरुण   त्याने ज्याप्रकारे साकारला आहे त्याला तोड नाही. नेहा जोशीने साकारलेली मास्तरची भांडखोर बायको, अर्जुनची कल्पु डार्लिंग असलेली पुजा सावंत, यांनी आपल्या भुमिकेला न्याय दिला आहे. उद्य सबनीस,भारत गणेशपुरे,नेहा बुगडे आणि इतर कलाकारांनी  चित्रपटात चांगला अभिनय केला आहे.
       अशा चित्रपटाची निर्मिती करण्याच धाडस श्रेयस तळपदेने दाखवले याबद्दल त्याचेही कौतुक. पुष्पांक गावडेच्या सिनेमॅटोग्राफीचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. लेझी यांच्या संगीतही चित्रपटास साजेस आहे. चित्रपटाचे प्रमोशनल साँग तर सर्वांच्या ओठावर रुळल आहे. क्षण हे आणि देवा देवा ही गाणीसुध्दा श्रवणीय आहेत. एकंदर तद्दंन चित्रपटापेक्षा काहीसा वेगळा विषय आणि त्याची विनोदी पध्दतीने केलेली हाताळणी यामुळे पोश्टर बॉइज् नक्कीच स्मरणीय ठरतो.     

शनिवार, २८ जून, २०१४

करो या मरो...







                          आज उपउपांत्यपूर्व फेरीची   (प्री क्वाटर फायनल) सुरवात होणार आहे  फुटबॉल विश्वचषकाचा हा  उत्तरार्ध आहे. आता खऱ्या अर्थाने फुटबॉल विश्वचषकाला रंगत येईल कारण सर्वोत्तम सघ एकमेकांसमोर उभे टाकतील यामध्ये  जो जिंकेल तो पुढच्या फेरीत आणि ज्याच्या वाटी 'पराभव' तो परतीच्या वाटेवर. ३२ संघांपैकी १६ संघ या फेरीसाठी पत्र ठरले आहे.या विश्वचषकात पोर्तुगाल,स्पेन,इंग्लंड आणि इटली या दादा सघांवर साखळी फेरीतच गाशा गुडाळायची वेळ आली. कोस्टा रिका,चिली आणि अल्जेरिया या संघांनी नामी संघाना धक्का देत पहिल्यांदाच बाद फेरी गाठली आहे.
                         बाद फेरीचा पहिला सामना  यजमान आणि पाच वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलचा गतविजेत्या स्पेनला धक्का देणाऱ्या चिलीशी होणार आहे. ब्राझीलच या सामन्यात पारड जड वाटत असल तरी जायंटकिलर चिली ला कमी लेखता येणार नाही.ब्राझीलच्या युवा फुटबॉलपटू नेयमारवर साऱ्या जगाचे लक्ष लागून आहे नेयमार सध्या फोर्मात असल्याने त्याचाकडून चाहत्यांच्या अपेक्षा आहेत.
                        दुसरा सामना आहे उरुग्वे आणि कोलंबियात  चावऱ्या  सुआरेझवर बंदी आणल्याने   उरुग्वे संघाची ताकद कमी झाली आहे याचा फायदा कोलंबिया उठवून अजून एक धक्का देते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
                        आज पासून विश्वचषकातील रोमहर्षक आणि श्वास रोखून धरणाऱ्या लढतींना आरंभ होईल. त्यामुळे फुटबॉल रसिकांसाठी आजपासून प्रत्येक सामना महत्वाचा असेल यात काही शंका नाही. 

शनिवार, १७ मे, २०१४

अब अच्छे दिन आ गये है…





                                 

                      नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत भाजपा आणि एनडीएला अभूतपूर्व यश मिळाल आहे.गेल्या दहा वर्षात केलेले घोटाळे,भ्रष्टाचार यामुळे  काँग्रेसला जनतेने अस्मान दाखवले. नरेंद्र मोदींची  लाटही एवढी विशाल होती की कॉंग्रेसला पन्नाशीही पार करता आली नाही. तब्बल ७ राज्यांमध्ये भाजपने पूर्ण बहुमत  प्राप्त केले यावरूनच देशातील  वातावरण मोदींमय झाल्याचे दिसून येते.महाराष्ट्रामध्ये महायुतीने  काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चारीमुंड्याचीत केले. सत्तेची आणि पैशाची मस्ती चढलेल्या बड्या नेत्यांना  लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली. यावेळी देशात आणि  महाराष्ट्रात इतर कोणताही फॅक्टर चालला नाही इथे फक्त मोदी  फॅक्टर चालला त्यामुळे या  निवडणूक निकालावरून खरच अस वाटत आहे कि  अब अच्छे दिन आ गये है