गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

सर्वसमावेशक युगाचा अंत.

                   

आज सद्यकालीन राजकारणातील आवडता नेता निवर्तला. अटलबिहारी वाजपेयीजींना अंतःकरणापासून श्रद्धांजली.

जेव्हा बालपणी राजकारणाबद्दल जाणिव झाली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांचा पाकिस्तानचा दौरा ही पहिली आठवण होती. जेव्हा राजकारण नेमकं काय असतं हे समजू लागले तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी राजकारणातील सक्रिय सहभाग कमी केला होता मात्र त्यांच्याबद्दल माहिती मिळू लागली तसं तसा हा महान नेता मनी स्थान निर्माण करु लागला.

१३ दिवसांच सरकाराचा राजीनामा देताना देश रहना चाहिए, देश का लोकतंत्र रहना चाहिए हे त्यांच वाक्य अजरामर झाले. त्यानंतर वाजपेयीजींनी राष्ट्रीय लोकशाही दल स्थापन करुन अनेक विचारसरणीच्या पक्षांना एकत्र करून स्थापन केलेले सरकार, मुख्य म्हणजे सर्व पक्षांना सांभाळून सरकारचा कार्यकाल पूर्ण केला हे कौशल्य फक्त वाजपेयींमध्येच होत.पोखरण अणुस्फोट सारखा धाडसी निर्णय, कारगील युद्ध अशा महत्त्वपूर्ण घटना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सर्व शिक्षा अभियान या मुलभूत योजनांतून वाजपेयी सरकारची कामगिरी कळाली.

विरोधकांशी ही सन्मानाने वागणारा नेता, टीका करताना ही मर्यादा पाळणारा वक्ता, विजयाने उन्मादून न जाणारा आणि पराभवाने न खचणारा योध्दा, देशप्रेम, प्रेरणेने ओतप्रोत असणाऱ्या कविता करणारा कवी असे असंख्य गुण असणाऱ्या  या नेत्यांच राजकारणात सक्रिय नसणं यांचं दुःख मनी सदैव होत.

देशभक्त असणारे तुम्ही भारतमातेच्या उदरातच पुन्हा जन्म घ्याल यात शंका नाही. वाजपेयीजी तुम्हाला त्रिवार मुजरा. पुन्हा अंतःकरणापासून श्रद्धांजली.