बुधवार, ७ ऑगस्ट, २०१९

सुषमाजी हमेशा याद रहेंगे...




एक प्रभावी वक्ता, देशप्रेमी नेता और राजनीति के क्षेत्र में महिलाओं के लिए आदर्श स्थापित करनेवाले मेरे पसंदीदा  सुषमा स्वराज को भावपूर्ण श्रद्धांजलि।

 पासपोर्ट से लेकर विदेश में भारतीय लोगों की मदद करना। Twitter पे आए हुए समस्याओं के Twit का समाधान करना ये क्रांतिकारी बदलाव सुषमाजीने विदेश मंत्रालय में किए थे। इसिस ने बंधी बनाएं हुए भारतीय अस्पताल कर्मियों को सही सलामत भारत में लाने में सुषमाजी का महत्वपूर्ण योगदान रहा।

सुषमाजीने विदेश मंत्री रहते  वक्त  पाकिस्तान के लोगों को भारत में उपचार के लिए तुरंत व्हिसा दिया यह बात एक इंसानियत का सबसे बड़ा उदाहरण है। ऐसे अनेक कार्यों से सुषमाजीने विदेश मंत्रालय को एक ऊंचे स्तर पर पहुंचाया ।

सुषमाजीने  जिस तरह विपक्ष की नेता का पद संभाला था कॉन्ग्रेस को हिला के रखा था। उसी दौर में प्रधानमंत्री मनमोहन सिंहजी को शायराना अंदाज में दिया हुआ जवाब 'कुछ तो मजबूरीया  रहीं होंगी युही कोई बेवफा नहीं होता' सुषमाजी के ऐसे अनेक प्रभावशाली भाषणसे संसद गुंज उठी है। उनके भाषण सुनना हमारा भाग्य था।

राजनीतिक विरोधी नेताओं का सुषमाजीने हमेशा सन्मान किया। कल जब ३७० कलम हटाने के बाद उन्होंने किया हुआ Twitt 'इसी पल को देखने का इंतजार कर रही थी' जीवन के अंत के वाक्य में भी देशप्रेम ही था।

भारतीय लोकतंत्र के इतिहास में स्वर्णिम अक्षरों से सुषमाजी का नाम लिखा गया है।
सुषमाजी हमेशा याद रहेंगे। अंतःकरण से श्रध्दांजलि।

सोमवार, १० जून, २०१९

Champion is Always Champion

युवराजने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली माझ्यासह सर्व क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण आहे. युवराज क्रिकेटच्या मैदानात आणि वैयक्तिक जीवनात Fighter होता आणि राहिल.


२००० साली under 19 विश्र्वचषक भारताने जिंकला युवराज त्या विश्र्वचषकात मालिकावीर होता आणि त्यानंतर त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास सुरू झाला.२००२ नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळलेली जिगरबाज खेळी.त्यानंतर त्याकाळात मोहम्मद कैफ आणि त्याची जोडीने अनेक सामने जिंकविले. क्षेत्ररक्षणासाठी युवराज Point वर उभा असायचा आणि कित्येक अप्रतिम झेल त्याने टिपले.


२००७ T- 20 विश्र्वचषकात युवराजचे ६ चेंडूत ६ षटकार कोणताही भारतीय विसरू शकत नाही. २००७ चा विश्र्वचषक जिकंविणारा मुख्य शिलेदार युवराज होता. भारतीय क्रिकेटला २०११ साली तब्बल २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकविणारा युवराजच होता. विश्र्वचषकात त्याला शारिरिक त्रास होतानाही एका स्वप्नाकरिता खेळला आणि स्वप्न सत्यात आणले.


युवराजने कॅन्सरवर मात केली आणि वैयक्तिक जीवनातही तो Fighter होऊन अनेकांना प्रेरणादायी बनला. कॅन्सरवर मात करून त्याने भारतीय संघात पुनरागमन केले यासाठी युवराजला सलाम. २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध १५० धावा ( highest Score) करत जिगरबाज आणि अविस्मरणीय खेळी केली. युवराज तू आज निवृत्त झालास पण तुझ्या चाहत्यांसाठी तू कधीच निवृत्त नसशील त्यांना तुझ्या या खेळी सदैव आनंद देत राहतील.


युवराज भारतीय क्रिकेट इतिहासात तीन विश्र्वचषक जिंकविणारा खेळाडू आणि मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज, एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू म्हणून सुवर्ण अक्षरात नाव कोरले आहेस. युवराजने सामाजिक जाणीव जपत Youwecan नावाची सामाजिक संस्था कॅन्सरग्रस्तांकरिता सुरु करुन कॅन्सरच्या उपचारासाठी त्यांना मदत करत आहे.

शेवटी एवढंच म्हणीन खुप खुप धन्यवाद आम्हाला  तुझ्या खेळाने आनंद दिल्याबद्द्ल आणि You are Always Champion For us. Real Fighter .

मंगळवार, २८ मे, २०१९

अभिनंदन NDA, अभिनंदन भाजपा, अभिनंदन नरेंद्र मोदी.



मोदी सरकार सत्तेत पुन्हा येईल हे सर्वांना माहीत होते. मात्र इतका मोठा विजय होईल याची कल्पना फारच कमी लोकांनी केली असेल‌. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती मात्र आजही ही लाट आहे हे या विजयामुळे स्पष्ट होते आहे. भाजपा मित्रपक्ष यांचे समन्वय, भाजपा संघटन, कार्यकर्त्यांची मेहनत आणि सर्वात महत्त्वाचे मोदींचा करिष्मा यांचा हा विजय आहे. भाजपा, नरेंद्र मोदी, NDA या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.  सबका साथ, सबका विकास व्हावा हिच अपेक्षा.

जय भारत.