शनिवार, १७ मे, २०१४

अब अच्छे दिन आ गये है…





                                 

                      नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत भाजपा आणि एनडीएला अभूतपूर्व यश मिळाल आहे.गेल्या दहा वर्षात केलेले घोटाळे,भ्रष्टाचार यामुळे  काँग्रेसला जनतेने अस्मान दाखवले. नरेंद्र मोदींची  लाटही एवढी विशाल होती की कॉंग्रेसला पन्नाशीही पार करता आली नाही. तब्बल ७ राज्यांमध्ये भाजपने पूर्ण बहुमत  प्राप्त केले यावरूनच देशातील  वातावरण मोदींमय झाल्याचे दिसून येते.महाराष्ट्रामध्ये महायुतीने  काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चारीमुंड्याचीत केले. सत्तेची आणि पैशाची मस्ती चढलेल्या बड्या नेत्यांना  लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली. यावेळी देशात आणि  महाराष्ट्रात इतर कोणताही फॅक्टर चालला नाही इथे फक्त मोदी  फॅक्टर चालला त्यामुळे या  निवडणूक निकालावरून खरच अस वाटत आहे कि  अब अच्छे दिन आ गये है