प्रिय बासूदा,
तुम्ही छोटी सी बात, रजनीगंधा, चितचोर, दिल्लगी, बातो बातो मे, खट्टा मिट्टा अशा तुमच्या अनेक चित्रपटातून सामान्य माणसाच जीवन नर्मविनोदी आणि साध्या सरळ पद्धतीने आमच्या समोर मांडलात. कधी कधी साधेपणा जपणच खुप कठीण असत मात्र ते तुम्ही प्रत्येक चित्रपटात जपलं. आजही हे चित्रपट सामान्य व्यक्तीच्या जीवनाशी जोडले जातात यातच तुमच्या दिग्दर्शनाचे मोठेपण आहे.
ज्या काळात मारधाड, डायलॉगबाज चित्रपटांची चलती होती त्यावेळी बासुदा तुम्ही सामान्य माणसाच्या इच्छा,आकांक्षा,स्वप्न, संघर्ष, नाती हे चित्रपटातून मांडलात आणि ती तुमच्या चित्रपटांची ओळख बनली आणि ही ओळख चित्रपटसृष्टी असेपर्यंत कायम राहील. छोटी सी बातमधील बस स्टॉप, बातो बातो में मधील लोकल ट्रेन, चीतचोरमधील गाव, मंजील मधील शहरातला पाऊस अशा सामान्य माणसाच्या खऱ्या जीवनातील गोष्टीही जशाच्या तशा दाखवल्या, हे अस दाखवणे तुमचं वैशिष्ट्य होत.
ब्योमकेश बक्षी, एक रुका हुआ फैसला या वेगळ्या धाटणीच्या मालिकाही तुम्ही केलात. काही माणस न भेटताही अनेकदा आपल्यासाठी खजिना ठेवून जातात तसे बासूदा तुम्ही आहात तुमचे चित्रपट आमच्या सारख्या चाहत्यांसाठी अनमोल खजिना आहे जो आम्हाला सदैव आनंद देत राहिल.
ब्योमकेश बक्षी, एक रुका हुआ फैसला या वेगळ्या धाटणीच्या मालिकाही तुम्ही केलात. काही माणस न भेटताही अनेकदा आपल्यासाठी खजिना ठेवून जातात तसे बासूदा तुम्ही आहात तुमचे चित्रपट आमच्या सारख्या चाहत्यांसाठी अनमोल खजिना आहे जो आम्हाला सदैव आनंद देत राहिल.
तुमच्या कारकिर्दीला सलाम
बासुदा भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
तुम्ही सदैव स्मरणात राहाल.