बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

चक दे इंडिया


 

आज भुवनेश्वर येथे हॉकीचा रणसंग्राम सुरू होत आहे. १६ संघाचा समावेश असलेल्या विश्र्वचषक स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे लक्ष्य मायदेशात विश्र्वचषक जिंकून देशाला अविस्मरणीय भेट देण्याचे असेल. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी करुन हॉकीतील मरगळ झटकून टाकली आहे. सध्या जागतिक स्तरावर भारत ५ व्या क्रमांकावर असून विजेतेपदाचा प्रमुख दावेदार आहे.प्रशिक्षक हरिंदर सिंग यांनी भारताला २१ वर्षांखालील विश्र्वचषक जिंकून दिला होता आता हा विश्र्वचषक जिंकण्याच्या ध्यासाने ते आणि त्यांचे खेळाडू मैदानात उतरतील हे नक्की.


भारताच्या खेळात प्रचंड सुधारणा झाली असून शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त रहावे याकडे लक्ष दिले गेले आहे. भारतीय हॉकीचे वैशिष्ट्य आहे कलात्मक खेळ आणि त्यासोबत पाश्चिमात्य देशांची शैली यांचा मेळ त्यांच्या खेळांमध्ये दिसतो आहे.हॉकी खेळ नसून भारतीय अस्मिता आहे. हॉकीच देशवासीयांशी भावनिक नाते आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर दमदार कामगिरी करत भारतीय संघाने  विश्र्वचषक जिंकावा याकरिता मनापासून शुभेच्छा.सर्व देशवासीय एकच जयघोष करीत आहेत तो म्हणजे

चक दे इंडिया.