कॅप्शन जोडा |
ज्या हॉकी खेळाने भारताला ऑलिम्पिकमध्ये तब्बल ८ वेळा सुवर्णपदक मिळवून दिले. त्या हॉकीची आज दयनीय अवस्था आहे. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. तसेच हॉकी संघटनामधील असणारे वाद .त्यामुळे हॉकीच्या भवितव्याचा विचार आतापर्यंत केला जात नव्हता.परंतु आयपील च्या धर्तीवर हॉकी इंडिया लीग सुरु करून हॉकीमध्ये व्यावसायिकता आणण्याचा प्रयत्न हा स्वागतार्ह्य आहे. त्यामुळे कमी मानधन मिळणाऱ्या हॉकी खेळाडूंना यामुळे चांगले मानधन मिळाले. हॉकी इंडिया लीग हि आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा असल्याने मध्ये अनेक परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यामुळे भारतीय युवा खेळाडूंना चांगला अनुभव मिळेल. हॉकी इंडिया लीगमुळे क्रिकेटवेड्या भारतामध्ये पुन्हा हॉकीला नवसंजीवनी मिळेल अशी आशा करूयात .