शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

जीवा लावी गोडी अशी नारबाची वाडी


होय महाराजा… 


                            नारबाची वाडी हा चित्रपट आज पाहिला. दिलीप प्रभावळकरांचा  सहज सुंदर अभिनय आणि गुरु ठाकूर यांच्या संवादाने चित्रपट मनाला भावतो. सर्व इतर कलाकारांनीही अभिनय उत्तम केला आहे. कोकणचे सौंदर्य आणि मालवणी कोकणी भाषेमुळे चित्रपटाला गोडवा प्राप्त झाला आहे. कथेची मांडणी अतिशय साधी सरळ आहे.हा चित्रपट पाहिल्यावर कुठे तरी अस वाटत सारखे सारखे सस्पेंस आणि वेगळ करण्याच्या नादात आपण साधेपणा विसरतो. साधेपणातहि मजा असते. ती रंजकता या चित्रपटातून दिसते. 'शबय शबय' आणि 'गझाल खरी काय' हि  चित्रपटातील  गाणीहि गुणगुणावीशी वाटतात. माणसाची प्रवृत्ती आहे  की जरी त्याच्याकडे सर्व असेल तरी त्याला  समाधान नसते सतत त्याला कुठल्या न कुठल्या गोष्टीचा हव्यास असतो आणि  याच लोभी वृत्तीवर चित्रपटातून भाष्य केल आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्या आवडत्या चित्रपटांत येतो.