2024 ची लोकसभा निवडणूकीचे मतदान एक जून रोजी पार पडले तब्बल सात टप्प्यात हे मतदान पार पडले त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता भारतातील प्रमुख चॅनेलवर एक्झिट पोल सादर केला गेला. कमालीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व एक्झिट पोल हे मोदी सरकार येणार हे दर्शवत होते पण त्यांनी दाखविलेले चमत्कारिक आकडे मात्र कळत नव्हते 350 ते 400 याच आकड्यांमध्ये बहुतांश एक्झिट पोल होते. त्यावरून नंतर थोडा गदारोळ झाला विरोधी पक्षांनी या एक्झिट पोल पेक्षा एक्झॅक्ट पोलला महत्व देऊ असे जाहीर केले. राहुल गांधीने तर हे मोदी मीडिया पोल आहे असं संबोधले. या पोलमुळे एकंदर भाजप आणि एनडीए घटक पक्षांमध्ये एक सकारात्मक आणि विजयाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या तुलनेत विरोधकांनी एक्झिट पोल येण्याअगोदरच आम्ही इंडिया आघाडी 295 हून जास्त जागांवर विजय होऊ असे सांगितले.
गेल्या दोन महिन्यांमध्ये निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोचला होता संविधान, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरती प्रचार केंद्रीभूत होता अनेक पत्रकारांनी आणि राजकीय विश्लेषकांनी ग्राउंड रियालिटी अनुभवले आणि त्यांच्या मतानुसार यावेळची निवडणूक ही 2014 आणि 2019 प्रमाणे भाजपाला पूर्णपणे अनुकूल नाही विरोधी पक्षही यावेळी लोकांमध्ये आपल्या मुद्दे योग्य पद्धतीने मांडत आहे. त्यामुळे सरकार भाजपचे येऊ शकतं पण खासदारांची संख्या ही गेल्या वेळी पेक्षा कमी येईल असेच सांगितले होते. त्यामुळे एक्झिट पोल आणि पत्रकारांनी,विश्लेषकांनी घेतलेला आढावा यामध्ये नक्की काय बरोबर हे आपल्याला चार जूनला कळणारच आहे आणि तो दिवस म्हणजेच उद्याचा दिवस.
खरंतर लोकसभा निवडणुकीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की विरोधी पक्षांनी यावेळी बऱ्यापैकी लढत देण्याचा प्रयत्न केला. 2019 ला मुळात विरोधी पक्ष दिसतच नव्हता यावेळी मात्र विरोधी पक्षाने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या लोकप्रियतेबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही पण गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी घेतलेले चांगले निर्णय हे त्यांच्या बाजूने जाणारच आहेत पण राज्यातील सरकार तोडणे, अनेक भ्रष्टाचारी नेतांना आपल्या पक्षात सामावून घेणे आणि काही अवाजवी घोषणा करणे यामुळे लोकांमध्ये थोडी का होईना नाराजी दिसली. त्याचं परिवर्तन मतांमध्ये होतंय की नाही हे निकालात कळेल. वोट शेअर किती मिळतो गेल्या वेळीच्या तुलनेत किती मताधिक्य असेल नसेल हे कळेल. अनेक मतदारसंघात ह्यावेळी खरंच चुरशीची लढत दिसली आहे त्यामुळे अत्यंत कमी फरकाने विजयी उमेदवार निवडून येतील. एक्झिट पोल त्या कमी फरकाचा पण ठाव घेऊ शकतो का हे आपल्याला निकालात कळून येईल.
एक्झिट पोल बद्दल काही ठराविक नियम असणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच एक्झिट पोल कशाच्या आधारावर घेतले आहेत? त्यांचा सॅम्पल साईज काय आहे? हे एक्झिट पोल घेणाऱ्या संस्थेने जाहीर करावं जेणेकरून लोकांमध्ये त्याबद्दल स्पष्टता निर्माण होईल. अनेकदा हे एक्झिट पोल खोटे ठरले आहेत त्यामुळे अमेरिकेमध्ये एक्झिट पोल घेताना या सगळ्या गोष्टी लोकांसमोर मांडण्यात येतात.त्या मांडणं भारतातही गरजेच आहे. यामुळे राजकीय पक्षांमध्ये आणि लोकांमध्ये एक्झिट पोल विषयी कुठलीही शंका राहणार नाही.
.jpeg)




.png)



