मराठी
रंगभूमीला भारतात मानाच स्थान आहे. प्रायोगिक नाटक ते व्यावसायिक नाटके यामध्ये
संगीत नाटकांचा भाग वेगळाच. प्रायोगिक नाटकांचा मुळातच बाज वेगळा असतो कारण
कोणतीही व्यावसायिक गणिते यामध्ये नसतात त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयांची
हाताळणी यामध्ये केली जाते. अनेक प्रायोगिक नाटके नंतर व्यावसायिक नाटके होतात.
काहीवेळा प्रायोगिक आणि व्यावसायिक असा सुरेख मेळ नाटकात साधण्यात येतो. ‘झोपाळा’ हे नाटकही याच
धऱतीवरील आहे. झोपळा हा शब्द ऐकल्यावर नॉस्टलेजिक व्हायला होत कारण प्रत्येकाने
झोपाळ्यावर झोका घेतलेला असतो त्या झोक्यात आपल्याला उंचावरुन झुर् खाली यायला होत
तसंच हे ‘झोपाळा’ नाटक.
मराठी
लेखकांमध्ये स्वतची वेगळी ओळख निर्माण केलेले दोन लेखक म्हणजे व.पू, काळे आणि
रत्नाकर मतकरी. झोपाळा या विषयावर या दोघांनीही कथा लिहिली आहे, व.पू.च लेखन
म्हणजे माणसाला प्रश्नार्थक करणार आणि मतकरीच्या लेखनात गुढता भरलेली अशी दोन्ही कथांवर
आधारित नाटक म्हणजे झोपाळा.
प्रथमेश परब,
भाग्यश्री शंकपाल (बालक पालक फेम ) आणि
डहाणुकर महाविद्यालयातील मुलांनी झोपाळा साकारले आहे. नाटकाची सुरुवातच एका कार्यालयातून होते.
कार्यालयातील जेष्ठ कर्मचारी (प्रथमेश परब) हा या कथा सांगतो. त्याच्याच
कार्यालयात स्टॅनो म्हणून काम करत असणाऱ्या ललितबद्दल ही कथा असते. ललित सोबत त्या
दिवशी एक उच्चभ्रू स्त्री कार्यालयापर्यंत येते. आणि मग सुत्रधार त्याला विचारतो
की ही स्त्री कोण ललित आपल्या बालपण आणि
मृदुला भाग्यश्री शंकपाल हीच शेजारी गावी राहण. झोपाळ्यावर झोका घेणे. पुढे मात्र
मृदुलाचा जीवनात संबंध नसणे आणि आता पुन्हा मृदुलाची भेठ होते. कॉलेजमधील खास
मैत्रीण आणि ललितला भावलेली जसवंतीही त्याच्या आयुष्यात पुन्हा येते. अशा घटना
एकाच वेळा घडतात आणि सर्व या कथेचा शेवट
शेवटी प्रश्नार्थक होतो.
मध्यंतरानंतर
दुसरी कथा सुरु होते. नाशकात राहणाऱ्या लिलूला लग्नासाठी मुलाकडचे पाहण्यास येतात.
त्यावेळी त्या मुलाची आई जणूकाही या वाड्यात वास्तव्य करते असे प्रश्न विचारते
त्यामुळे सर्वजण कोड्यात पडतात. त्यांच्या घरातील झोपाळ्यावर बसून ती यासर्व
गुढतेची उत्तर देते. कुसुमचं लग्न हे मुलीच्या वडीलांशी ठरलेल असते. मुलाकडच्यांवर
गंभीर प्रसंग येऊन दोनवेळा लग्नाचा मुहुर्त पुढे जातो त्यामुळे हे लग्न शेवटी
मोडते. मात्र कुसुमचे मन मात्र नाशकातील वाड्यातच अडकलेला असतो अशी मतकरीची
रहस्यमय कथा आहे.
नाटकातील
दोन्ही कथा वेगळ्या असल्या तरी झोपाळ्याशी निगडीत आहेत. पहिली कथा ही मनाचा ठाव
घेते. व.पू. काळे यांची ही कथा योग्य पद्धतीने साकारली गेली आहे. कलाकारांनी अभिनय
ही चांगला केला आहे. नाटकातील दोन्ही कथांमध्ये प्रकाशयोजनाचे वापर फार अप्रतिम
केला आहे. प्रकाशयोजनेमुळे नाटकाला वेगळे स्वरुप प्राप्त झाले आहे. सर्व दारातील
झोपाळ्याचा प्रसंग हा प्रेक्षकाला अचंबित करतो. नाटकातील संगीतही साजेस आहे.
मध्यंतरानंतर
दुसऱ्या कथेची सुरुवात फार गुढ होते. आपोआप झोपाळा हलणे, कुसुमचे विचित्र वागणे यामुळे
प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात परंतु वारंवार येणारे तेच प्रसंगामुळे कथा
कंटाळवाणी होते. तरीही या कथेमध्येही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे मात्र कथा
योग्य पध्दतीने मांडली गेली नाही असेच वाटते. रत्नाकर मतकरींची कथा ज्याप्रमाणे
गुढ असावी अशी ती वाटत नाही.
दोन्ही कथा
मांडण्याचा प्रयत्न चांगला केला असला तरी दुसरी कथा फारशी जुळून येत नाही त्यामुळे
पहिली कथा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. नाटकाच नैपथ्य ही कथेला साजेस आहे.
एकंदर झोपाळा हे नाटकाची मांडणी वेगळी आहे. विषयहिन हिंदी चित्रपटांना पैसे
घालण्यापेक्षा झोपाळा नाटक तुम्हाला नक्कीच तुम्हाला वेगळा अनुभव देऊन जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा