शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

ऑलंम्पिक इससे बडा कुछ नही ।

                         



ऑलंम्पिक इससे बडा कुछ नही । अशी टायटल असणारी जाहिरात गेल्या महिन्याभरापासून स्टार स्पोर्ट्स चॅनलवर प्रक्षेपित होत आहे. खरच ऑलंम्पिकसे बडा कुछ हो ही नही सकता। जिथे जगभरातील मातब्बर खेळाडू इर्षेने जिद्दीने फक्त देशाची शान वाढविण्यासाठी संघर्ष करतात. जिथे येणारा प्रत्येक खेळाडू फक्त ऑलंम्पिकमध्ये पदक मिळाव हेच स्वप्न बघून जगत असतो.  ज्याठिकाणी नव नवे विश्वविक्रम रचले जातात. जिथे जात, धर्म, पंथ आड न येता फक्त गुणवत्तेला आणि प्रतिभेला जग सलाम करत ते ठिकाण म्हणजे ऑलंम्पिक.

आधुनिक ऑलंम्पिकचे जनक

 सर कुंबर्टिन या फ्रेंच शिक्षण तज्ज्ञ आणि इतिहास संशोधकास ग्रीसमधील इतिहासाच्या अभ्यासात  ऑलंम्पिक ही संकल्पना मिळाली. सर्व खेळांच्या स्पर्धा एकाच ठिकाणी होणे तेही इसवी सन पूर्व काळात  ही संकल्पनाच विलक्षण होती. या संकल्पनेने सर कुंबर्टिन भारावून गेले आणि सुरु झाला एक ध्यास तो म्हणजे जगभरातील सर्व देशांना एकत्र करुन पुन्हा ऑल्मंपिक चळवळ सक्रिय करायचा. १८९४ साली ऑलंम्पिक संघटनेची स्थापना करुन दोन वर्षाने १८९६ अथेन्स ऑलंम्पिक क्रिडा स्पर्धा भरविण्यात आली आणि इथूनच सुरुवात झाली ती आधूनिक ऑलंम्पिकची. सर कुंबर्टिन यांना आधूनिक ऑलंम्पिकचे जनक मानले जाते.

रिओ ऑलंम्पिक
     फुटबॉल साठी प्रसिध्द  असणाऱ्या आणि जिथे फुटबॉलचा देव ब्लॅक पर्ल जन्माला अशा ब्राझील देशात २०१६ ची ऑलंम्पिक स्पर्धा आजपासून सुरु होईल. अमेरिका, चीन, जपान भारतासह जगाच्या नकाशावर न दिसणारे देश या स्पर्धेत सहभागी होतील. प्रत्येक खेळाडू आपल्या जीवनातील सर्वोत्तम कामगिरी करिता तयार झाला आहे. वेध लागले आहेत फक्त केव्हा ऑलंम्पिक मशाल पेटविली जाते याचे आणि स्पर्धेला सुरुवात होते.

भारत आणि ऑलिंम्पिक
     आतापर्यंत भारतातील प्रत्येक खेळाडूचे स्वप्न फक्त ऑलंम्पियन होण्याचे होते पण बीजिंग आणि लंडन ऑलंम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेत कमालीचा बदल झाला आहे. आता प्रत्येक भारतीय खेळाडू हा पदक मिळविण्याच्या हेतूने रिओमध्ये दाखल झाला आहे. उद्घाटन सोहळ्यात जेव्हा अभिनव बिंद्रा भारतीय ध्वज डौलाने फडकवेल त्यासह ११८ जणांचा भारताचा आतापर्यंतचा मोठा चमू स्टेडियमवर येईल तेव्हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. जितू राय, योगेश्वर दत्त, अभिनव बिंद्रा, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, दिपिका कुमारी या खेळाडूंच्या कामगिरीचा विचार केल्यास हे खेळाडू भारताचे सुवर्णपदकाचे दावेदार आहेत. अडथळ्यांची शर्य़त पार करुन सहभागी झालेला मल्ल नरसिंग यादव वर सर्व जगाचे लक्ष लागले आहे.
     भारत आणि ऑलंम्पिक हॉकी सुवर्णपदक हे समीकरण होत मात्र मधल्या काळात भारतीय हॉकीची फार पिच्छेहाट झाली त्याच हॉकीमध्ये यावर्षी  ऑलंम्पिक स्पर्धेत पुन्हा पदक मिळवून दिले जाईल असा अनेक क्रिडा रसिकांचा विश्वास आहे. जिमनॅस्टिक दिपा कर्माकर हिच्याकडून भारताला पदकाची उमेद आहे याव्यतिरिक्त अन्य खेळाडू ही त्यांच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करतील आणि देशाला पदक तालिकेत मानाचे स्थान मिळवून देतील अशी आशा आहे.

भावनात्मक उत्कंटा
     आजपासून उसेन बॉल्ट, मायकल फेल्पस यांच्या विक्रमांची चर्चा असेल. पदकांची लयलुट होईल. अनेक विक्रम मोडले जातील अनेक नवे ऑलंम्पिक विजेते जगाला मिळतील. अमेरिका आणि चीनमध्ये पदकतालिकेतील अव्वल स्थानासाठी काटे की टक्कर असेल. पुढील १८ दिवस  ऑलंम्पिकमय जग पाहायला मिळेल. आम्हा भारतीयाचे कान लागून राहिले आहेत ते फक्त त्या खेळाडूंकडे ज्यांच्यामुळे तब्बल ८ वर्षानंतर भारताचे राष्ट्रगीत ऑलंम्पिकमध्ये वाजविण्यात येईल आणि भारतीय खेळाडूंच्या सुवर्णपदाकाचा तो सुवर्ण क्षण अनुभवण्याकडे.

रविवार, ३ जानेवारी, २०१६

'नटसम्राट' असा नट होणे नाही।

                  



      नटसम्राट ही कुसुमाग्रजांची  एक अजरामर कलाकृती. त्या कलाकृतीवर आधारित जो चित्रपट मी आज पाहिला नटसम्राट असा नट होणे नाही, तो चित्रपट म्हणजे एक विलक्षण अनुभुती. या चित्रपटाने ह्रद्याला स्पर्श केला. नटसम्राटाच्या आयुष्याची ओढाताण नाटकच जो जगला त्याची होणारी फरफट हे चित्रपटातून दाखवल आहे. चित्रपटाची कथा, तांत्रिक बाजू उत्तम आहेत. पण जे काळजाला भिडतात आणि डोळ्यांच्या कडा ओल्या होतात असे संवाद या चित्रपटात आहेत.  कोणी घर देता का घर, एका तुफानाला कोणी घर देता काजगाव की मराव हा एकच सवाल आहे. तुम्ही नाटक घरी घेऊन आलात असे संवाद चित्रपटाला एका अद्भूत कलाकृतीकडे घेऊन गेले आहेत.  संवाद लेखक किरण यज्ञोपवती आणि अभिजीत देशपांडे यांना याचे श्रेय जाते.
     मेधा मांजरेकर, विक्रम गोखले यांनी आपल्या भूमिका अप्रतिम साकारल्या आहेत. सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, अजित परब इतर कलाकारांनी अभिनयातून छाप पाडली आहे. ज्या विषयी बोलाव तेवढ थोड ते म्हणजे नाना. 'गणपतराव बेलवलकर' ही व्यक्तीरेखा त्यांनी जगली आहे. शब्द फेक, चेहऱ्यावरील भाव आणि प्रसंगानुरुप बदलणारी देहबोली यामुळे प्रेक्षकांच्या मनावर नाना अधिराज्य गाजवतात. या नटास खरच वंदन. दिग्दर्शक महेश माजंरेकरांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. एका अजरामर नाटकाला एका अजरामर चित्रपटांमध्ये रुपांतरण केले आहे. नटसंम्राट या कलाकृतीला प्रेक्षकांच्या टाळ्यांची नव्हे तर अश्रूंनी दाद दिली आहे . प्रेक्षकगृहात नावे पडेपर्यंत प्रेक्षक जागच्या जागी बसून राहतो. खरच शब्द अपूरे आहेत या कलाकृतीबद्दल बोलण्यासाठी शेवटी एवढच म्हणीन की, एका इतिहासाचे साक्षीदार होता आले हे आपले भाग्य आहे.
असा नट होणे नाही
असा नटसम्राट होणे नाही
अशी कलाकृती होणे नाही।


बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

क्यो की जिंदगी गुलजार है...






         गुलजार साहेब म्हणजे एक सदाबहार व्यक्तिमत्व, एक   गीतकार म्हणून त्यांचा झालेला परिचय.  परिचय, अंगूर या चित्रपटातून त्याच्या दिग्दर्शनाची छापही मनावर पडते. या वर्षीच त्यांचे काही कवितासंग्रह वाचनात आले. मकान ही कविता तर हद्याचा ठाव घेते. भावनांना गुलजारांच्या शब्दांची जोड मिळाली की त्या मनात खोलवर रुजतात. मानवी स्वभावाचे दर्शन रावी के पार या कथासंग्रहातून होत. गेली अनेक वर्षे हा चिरतरुण कवी, गीतकार चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांच्या जन्मदिनी काही पक्तीं सुचल्या त्या त्यांना समर्पित करतो. 
                  

प्यार हि जिंदगी का असली मतलब होता है क्यो कि जिंदगी गुलजार है !
न धर्म मानता हु न जात सिर्फ इन्सानियत को मानता हू क्यो कि जिंदगी गुलजार है! 
उर्दू हिंदी पे दिलसे मोहोब्बत करता हु क्यो कि जिंदगी गुलजार है !
हर पल नई उमंग दिलाता है क्यो कि जिंदगी गुलजार है !
मेरे कलम से कुछ लिख पाता हु क्यो कि जिंदगी गुलजार है !



सोमवार, १ डिसेंबर, २०१४

इंटरनेट एक व्यसन

आजच्या काळात सर्व सोयी सुविधा आपल्याला मिळाल्या आहेत.मानवाने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात फार प्रगती केली. इंटरनेटमुळे तर माहितीचा  विस्फोट होऊन जगाचे  द्वारच खुले झाले आहे. कोणत्याही व्यक्तीस कुठल्याही स्वरुपाची माहिती  इंटरनेटच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध झाली.इंटरनेटमुळे खऱ्या अर्थाने जग जवळ आले. भारतात आर्थिक उदारीकरणानंतर इंटरनेटचे जाळे वेगाने पसरले. या इंटरनेटच्या फायद्याप्रमाणे तोटेही आहेत. कोणत्याही गोष्टीचा वापर केला असता समतोल साधणे फार महत्वाचे आहे. त्याचा अतिरेक झाल्यास त्याचे दुष्परिणाम हे होणारच त्याप्रमाणे इंटरनेटचा जास्त वापर केल्यास त्याचे व्यसन लागू शकते.


       आजची तरुणाई हि फेसबुक वोट्सअपवर बिझी असते. या साईटचा वापर करताना  आसपासच्या जगाचे भानही त्यांना राहत नाही.इंटरनेटवर सर्वात जास्त बघितल्या जाणाऱ्या साईटमध्ये पोर्नोग्राफिक साईटसचा समावेश होतो. या  पोर्नोग्राफिक साईटसवरील व्हिडियो पाहून अनेकवेळा तरुण वाईट मार्गी जातात. तरुणांमध्ये विकृती वाढण्याच्या कारणांत इंटरनेटचा समावेश होतो. 
घरगुती इंटरनेटच्या वाढत्या प्रमाणामुळे 'इंटरनेट एडिक्शनअर्थात 'इंटरनेट'चे व्यसन लागण्याचे शहरातील मुलांचे प्रमाणही वाढले आहे. या व्यसनाधीनतेचा प्रत्यक्ष संबंध मेंदूमधील रसायनांचे प्रमाण बिघडण्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार 'इंटरनेट'चा वाढता वापर चिंतेत भर घालणारी बाब असूनकम्प्युटर अथवा तत्सम इंटरनेट पाहण्याच्या साधनांच्या प्रमाणाबाहेर वापराने चिडचिडअतिताण आदी विकार जडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. इंटरनेटचा इतका वापर तरुण मुले करतात कि आई वडिलांशी असलेला मुलांचा संवाद कमी होत आहे. इंटरनेटमुळे मुले मैदानी खेळ विसरले आहेत.

  इंटरनेट व्यसनात गुरफटलेली ही मुले  खऱ्या सामाजिक संवादापासून दुरावलेलीच राहातात. कौटुंबिक नातेसंबंधांवर परिणाम होतो. या सर्व सामाजिक एकलकोंडेपणाचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. वास्तवाशी/सत्याशी नातं तुटल्याने वा कमी झाल्याने ही मुलं सायकोसिस/स्किझोफ्रेनियाची बळी ठरू शकतात.कुमारवयीन तरुणांमधील आत्महत्या व त्यांच्यातील वाढती हिंसक वृत्ती या आजघडीच्या गंभीर समस्येलागढुळलेले कौटुंबिकसामाजिक स्तरावरले पदर जसे कारणीभूत आहेत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे कळत-नकळत होणारे दुष्परिणामही जबाबदार आहेत. इंटरनेट व्यसनाधीनता हे यातील एक महत्त्वाचं कारण!              


इंटरनेटचं व्यसन सोडवण्यासाठी मुक्तांगण


         जेव्हा कोणत्याही गोष्टीला भुलून त्याचा अतिरेक वापर केला जातोतेव्हा खरी त्या गोष्टीच्या व्यसनाची सुरवात होते. पण आजच्या जगात दारूतंबाखूचरसगांजा हेच फक्त व्यसन  राहील नाहीये. तर इंटरनेट ही व्यसनासारख वापरलं जावू लागलंय. अशाच इंटरनेट व्यसनी विद्यार्थीआणि मोठ्या व्यक्तींसाठी मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्रात इंटरनेट एडिक्शन सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातायेत.आजच प्रगत तंत्रज्ञान ज्या प्रमाणे आजच्या पिढीसाठी जगाच्या स्पर्धेत तारक आहे.तस्च ते त्यांच्यासाठी मारक बनत चालंल आहे. आजकाल टीव्हीकम्प्युटर यांचा वाढता वापर. त्यात तासंन तास इंटरनेटसोशल नेट वर्किंग साईट्सगेम्सपोर्न मुव्हीजचॅटीगमुळे ते सतत त्यातच गढून राहातायेत..त्यांच्या बोटांना आणि डोळ्याला तो एक चाळाच लागलाय.        

दिवसातला अर्ध्याहून अधिक वेळ ते या गोष्टींसाठी घालवतात आणि दारूतंबाखूचरस गांजा यांसारख या इंटरनेटचं व्यसन जडवून घेतायेत. सायबर कॅफेमध्ये जाऊन बसतात. कॉलेज शाळा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करायेत असं ही समोर येतंय. म्हणजेच या महाजालात ते स्वत:ला अडकून घेतायेत. आजच्या प्रगत समाजातली ही एक गंभीर समस्याच बनत चाललीये. याचसाठी आता अशा व्यक्तींना व्यसन मुक्ती केंद्राची मदत घ्यावी लागतेय.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केद्रात ही या वर्षभरात इंटरनेट एडीक्शनच्या ब-याच केसेस दाखल झाल्यात. यामध्ये १५ ते २२ वयोगटातील मुलं- मुलींच प्रमाण जास्त आहे.याच अजून एक कारण आहे ते नोकरदार आई वडील. ते घरात नसल्याने मुलांवर लक्ष ठेवल जात नाहीआणि मग परिणामी ते या व्यसनाच्या आहारी जातातअशा विद्यार्थ्यांवर उपचार कारण हेही एक चेलेंज आहे मुक्तांगण मध्ये आता या व्यसनावरही उपचार आता देण्यात येत आहेत.
त्यामुळेच आता ही पालकांचीच खरी कसोटी आहे कीआपल्या मुलाला. आजच्या या जीवघेण्या स्पर्धेत प्रगत. तंत्रज्ञानापासून दूर ठेवायचं तर नाही. पण त्याला याच सगळ्याचं व्यसनी ही बनवायचं नाही. एक सशक्त व्यक्ती म्हणून त्याला समाजात उभ करायचं.

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

पोइसरचा आठवडा बाजार

पोइसरचा आठवडा बाजार


बाजार हा शब्द कानावर येतो आणि आठवण येते गावच्या आठवडा बाजाराची. गावाकडे खूप पूर्वीपासून आठवड्यातून एकदा बाजार भरविण्याची पध्दत आहे. आमच्या गावी मंगळवारचा आठवडा बाजार भरविला जातो, त्यादिवसाला गावी वाढदिवस असेही  म्हणतात. सगळे जण या आठवडा बाजारात जाऊन काय ना काय खरेदी करतात. गावच्या बाजारात उगाचच फिरण्याचीही मजा काही औरच असते. पंचक्रोशीतील छोटे विक्रेते येथे येतात तसेच ग्राहकही येतात. बाजाराच्या दिवशी गावाला वेगळाच रंग चढलेला असतो. इकडे मुंबई शहरात मात्र  आठवडा बाजार भरणे हे विरळच असेल. कांदिवलीतील पोईसर येथे मात्र गेली अनेक वर्षे बुधवारचा बाजार भरतो.
       
     मुंबईही पूर्वी बांद्र्यापर्यंतच मर्यादित होती. त्यानंतरच्या काळात मुंबई उपनगरचा विकास झाला.याविकासामध्ये मुंबईतील मिठी, पोईसर, दहिसर नद्यांचे नाले झाले आणि त्याचा परिणाम २००५ मध्ये आलेल्या महापूरात दिसले. पोईसर नदीच्या म्हणजे नाल्याच्याजवळ हा बाजार भरविला जातो. अवर लेडी ही कांदिवलीतील जुनी शाळा आणि चर्चही तिथे आहे. या बाजारासाठी एक जागाच आरक्षित असली तरी ती जागा अपूरी पडत असल्याने अनेक लहान विक्रेते रस्त्यावर आपल दुकान मांडतात.  

     बाजारामध्ये भाजीपाला, फळे, लहान मोठ्या वस्तू(चमचे, सुरी, लहान भांडी, इत्यादी),खोटे दागदागिने, कपडे हे फार स्वस्त दरात मिळतात. पण पोईसरचा बाजार हा माशांसाठी प्रसिध्द आहे. हलवा,पापलेट या ताज्या माशांपासून जवला, बांगड्याच्या सुक्या माश्यापर्यंत सर्व मासे इथे मिळतात. ''ओ... दादा ओ.. मावशी आवर ये १०० ला जोरी घे'' असा कोळींणीचा आवाज गर्दीमध्ये येत असतो. त्यामुळे मासांहार करणाऱ्यांची इथे फार रेलचेल असते.  सुतळ, गोणी, टोपल्या, किचन्स, लहान मुलांसाठी स्वस्तातील चायना खेळणी अशा काही वस्तू आहेत जे कुठेही उपलब्ध नसतात ते फक्त या बाजारात मिळतात.
    
     वडापाव, कटलेट्स, भजीपाव यांचे छोटे स्टॉल बाजाराच्या मध्यातच असतात त्यामुळे बाजारात फिरताना आपले लक्ष तळलेल्या वड्यांकडे जाते आणि मग खाण्याचा मोह आवरता येत नाही. सध्या वडापावची किंमत साधारण १० ते १२ रुपये आहे. मात्र पोईसरच्या बाजारात एक वडापाव ७ ते ८ रुपयाला मिळतो.  बाजूलाच घुंगराचा खळ खळ करणारा उसाचा रसवाला असतो. १० ते १५ रुपयाला मिळणारा उसाचा रसही येथे फक्त ७ रुपयांमध्ये मिळतो. त्यामुळे बाजारात खरेदी करता करता पेटपूजाही होते ती ही स्वस्तात.
     
       पोईसरच्या बाजारामध्ये फिरण्यातच आपले तास, दोन तास कसे निघतात हेच कळत नाही सकाळी १० च्या सुमारास सुरु होणारा बाजार संध्याकाळी संपतो. बाजार जरी रोज भरत नसला तरी प्रत्येक ग्राहक आणि विक्रेत्याच्या मनात मात्र बाजारासाठी खास अशी जागा असते.आजच्या काळात मुंबईसारख्या शहरामध्ये वेगाने मॉल संस्कृती वाढत आहे. एकाच छताखाली सर्वकाही तेही एसीच्या हवेत असे जरी मॉलचे वैशिष्टय असले तरी प्रत्येकाला मॉलमधून वस्तू विकत घेणे परवडत नाही. अनेक अशा वस्तू ( किचंन्स, खोटे दागदागिने)आहेत त्यांची मॉलमध्ये कायच्या काय किंमत असते मात्र तिच वस्तू आठवडा बाजारात खूप स्वस्त मिळते. आठवडा बाजारात होणारी गर्दी ही मॉल्समधील ग्राहकांच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त असते.
     
     पोईसर आठवडा बाजाराचे चारकोप पोईसरवासियांच्या दृष्टीने वेगळे महत्व आहे. गेली कित्येक वर्ष हा बाजार सुरू असून दिवसेंदिवस या बाजारातील विक्रेत्यांची आणि ग्राहकांची संख्या वाढतच आहे. खुल्या आसमंतात  Fixed rate चा बोर्ड नसलेल्या विक्रेत्यांकडून वस्तूची खरेदी करण्यातही वेगळा अनुभव असतो. त्यामुळे जरी शहर कितीही झपाट्याने बदलले तरी पोईसरच्या आठवडा बाजाराचे महत्व कधीही कमी होणार नाही हे नक्की.


सोमवार, २४ नोव्हेंबर, २०१४

अमोल पालेकर - बातो ही बातों मे


                

काहीवेळा माझ अस होत की मी घऱातून कॉलेजसाठी लवकर निघतो ( बाकीच्यावेळी माझी तारेवरची कसरत म्हणजे धावपळीचाच कारभारच असतो)पण त्यावेळी बस उशीरा येते. आजही तेच झाल पण नशीब चांगल कारण रोजची ट्रेन मिळाली. ट्रेन मिळण्याचही  एक कारण  आहे ते म्हणजे आपल्या लोकल वेळेवर येत नाहीत आणि माझ्यासारख्यां उशीरा निघायची सवय असलेल्यांना ह्याचा फायदा होतो. विलेपार्ले स्टेशला उतरल्यावर कॉलेजला जाईपर्यंत एफ एम ऐकत असताना माझ्या आवडत्या अभिनेत्याचा वाढदिवस आहे हे कळल. हा अभिनेता आजच्यासारखा ६ पॅकवाला हिरो नाही.यानं चित्रपटात कधीही मारधाड केली नाही. यांच वैशिष्ट म्हणजे ते सामांन्यातील एक आहेत पडद्यावरही आणि खऱ्या आय़ुष्यातही त्यामुळेच ते सर्वांना आपल्यातले वाटतात. अभिनेते आणि तितकेच संवेदनशील दिग्दर्शक म्हणजे अमोल पालेकर यांनी आज ७१ वर्षात पदार्पण केले. अमोल पालेकर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.


        'अमोल पालेकर' हे नाव मी लहाणपणी ऐकल असेल पण ते कसे दिसतात त्यांचे चित्रपट कोणते हे मला १२ वी मध्ये कळल. टिव्हीवर त्यांच्या छोटी सी बात या चित्रपट काहीसा भाग मी पाहिला. त्यातील साधेपणा भावला आणि तो चित्रपट पूर्ण पाहता यावा यासाठी मी माझ्या अनेक मित्रांना विचारले पण त्यांच्याकडे हा चित्रपट मिळाला नाही. शेवटी काही दिवसानंतर इंटरनेटवर या चित्रपट मिळाला. परीक्षेसाठी जेमतेम आठवडा  बाकी असताना मी हा चित्रपट पूर्ण बघितला चित्रपटातील सांमान्य माणसाच्या प्रेमाची कथा अमोल पालेकर यांचा सहज सुंदर अभिनय. विद्या सिन्हांनी दिलेली साथ असरानी आणि अशोक कुमार यांची जुगलबंदी बासु चॅटर्जी यांच्या दिग्दर्शन ७० च्या दशकातील मुंबई यामुळे या चित्रपट मला प्रचंड आवडला.

    १२ वीच्या सुट्टीत गावी गेलो होतो. तेव्हा 'गोरी तेरा गाव बडा प्यारा' हे गाण एक काका गुणगुणत होते त्यावेळी मी त्यांनी मला सांगितल की हे गाण 'चितचोर' या चित्रपटातल आहे ते म्हणाले की ''मी मुंबईत असताना हा चित्रपट पाहिला होता अमोल पालेकरची अक्टींग मस्त आहे आणि गावातील कथा आहे''. त्याच्यां  सांगण्याने अमोल पालेकर यांच्या चित्रपटाविषयी मनात ओढ निर्माण झाली. त्यांचे चितचोर, गोलमाल, नरम गरम, रजनीगंधा हे चित्रपट पाहिल्यावर त्यांच्या नर्मविनोदी भुमिका आणि सहज सुंदर अभिनयामुळे अमोल पालेकरांचा मी दर्दी चाहता झालो. ते  माझे आवडते अभिनेते झाले. आजही त्यांचे चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहतो त्यामधील सामान्य माणसाशी जोडलेली नाळ आणि त्यांची अदाकारी प्रत्येकवेळी भारावते.

अमोल पालेकर यांची कारकिर्द

    जे जे स्कूल ऑफ आर्टसमध्ये त्यांनी फाइन आर्टस शिकले. चित्रकार असलेल्या अमोल पालेकर यांनी 'शांतता कोर्ट चालू आहे' या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २९ व्या वर्षी रजनीगंधा (१९७४) हा चित्रपट त्यांचा पहिला चित्रपट. दिनेश ठाकूर आणि विद्या सिन्हांच्या या चित्रपटामध्ये त्यांची भूमिकाही छाप पाडून जाते. त्यानंतर 'छोटी सी बात' सारखा सामांन्य माणसाच्या प्रेमावरील रंजक चित्रपट. चितचोरमधून शहरी तरुण आणि गावातील मुलींच प्रेमावर आधारित कथानक असलेल्या चित्रपट हे चित्रपट त्यांच्या सहज सुंदर अभिनयामुळे स्मरणीय ठरले.  

   अमोल पालेकर झरीना वहाब आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अभिनयामुळे गाजलेल्या घरोंदामध्ये शहरातील सामांन्य माणसाचा संघर्ष मांडला आहे. अमोल पालेकर यांनी काहीशी निगेटिव्ह व्यक्तिरेखा या चित्रपटात साकारली आहे. श्याम बेनेगल यांच्या 'भुमिका' (१९७७) चित्रपटामध्ये त्यांनी खलनायकी भुमिका साकारुन प्रेक्षकांना अचंबित करुन टाकले. बासु चॅटर्जी यांच्या बातो ही बातो में सारखा रेल्वेमध्ये होणाऱ्या प्रेम आणि बांद्र्यातील ख्रिश्चन कुटुंबावर आधारित चित्रपटामध्ये अमोल पालेकर-टीना मुनिम जोडी छान जमून आली.

    ह्रषिकेश मुखर्जींचा गोलमाल हा चित्रपट १९७९ मध्ये प्रदर्शित झाला आणि चित्रपटातील डबल रोलमुळे अमोल पालेकर खऱ्या अर्थाने एक स्टार झाले. या चित्रपटाची विनोदी कथा उत्पल दत्तअमोल पालेकरबिंद्या गोस्वामी यांमुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. रामप्रसाद शर्माभवानी शंकर ह्या व्यक्तीरेखा गाजल्या.  भारतीय चित्रपटातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये या समावेश होतो. या चित्रपटातील अभिनयामुळे अमोल पालेकर यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

     अपने परायेजुठीनरम गरमरंगबिरंगीटॅक्सी-टॅक्सी असे अनेक चित्रपट त्यांनी केले. एक अभिनेता म्हणून सिमित न राहता त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. १९८१ मध्ये आक्रीत हा त्यांचा दिग्दर्शन केलला पहिला चित्रपट होता. थोडासा रुमानी हो जाय हा कल्पनारंम्य चित्रपट लक्ष्यवेधी ठरला. या चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या बारिश व्यक्तिरेखेचे विशेष कौतुक केले गेल. बनगर वाडी, ध्यासपर्व असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट करुन दिग्दर्शनातही आपले वेगळेपण कायम राखले.२००५ मध्ये पहेली हा शाहरुख खानराणी मुखर्जी याच्यावरील चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात आले यामध्ये त्यांच्या दिग्दर्शन कौशल्याचे यश आहे. कच्ची धूपनकाबकरीना करीना अशा टिव्ही मालिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.

    अमोल पालेकर यांच्या चित्रपटातून सामांन्य माणसाच्या जीवन त्यातील संघर्षत्याच्या भावनाप्रेमत्याच्या ईच्छा आकांशा दाखविल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्या अक्शन चित्रपटांच्या काळात नर्मविनोदी चित्रपटांमुळे लोकांना आपलासा वाटणारा अभिनेता अशी ओळख त्यांनी निर्माण केली. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांमुळे माझी ह्रषिकेश मुखर्जीबासू चॅटर्जी यां प्रतिभावान दिग्दर्शकांची ओळख झाली. एक उत्तम अभिनेता दिग्दर्शक म्हणून ते परिचित असले तरी अनेक सामाजिक उपक्रमात ते सक्रिय सहभाग घेतात. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये आणि आम्हा चाहत्यांच्या ह्रद्यामध्ये त्यांना आदराचे स्थान आहे.



बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४

झोपाळा




मराठी रंगभूमीला भारतात मानाच स्थान आहे. प्रायोगिक नाटक ते व्यावसायिक नाटके यामध्ये संगीत नाटकांचा भाग वेगळाच. प्रायोगिक नाटकांचा मुळातच बाज वेगळा असतो कारण कोणतीही व्यावसायिक गणिते यामध्ये नसतात त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयांची हाताळणी यामध्ये केली जाते. अनेक प्रायोगिक नाटके नंतर व्यावसायिक नाटके होतात. काहीवेळा प्रायोगिक आणि व्यावसायिक असा सुरेख मेळ नाटकात साधण्यात येतो. झोपाळा हे नाटकही याच धऱतीवरील आहे. झोपळा हा शब्द ऐकल्यावर नॉस्टलेजिक व्हायला होत कारण प्रत्येकाने झोपाळ्यावर झोका घेतलेला असतो त्या झोक्यात आपल्याला उंचावरुन झुर् खाली यायला होत तसंच हे झोपाळा नाटक.
मराठी लेखकांमध्ये स्वतची वेगळी ओळख निर्माण केलेले दोन लेखक म्हणजे व.पू, काळे आणि रत्नाकर मतकरी. झोपाळा या विषयावर या दोघांनीही कथा लिहिली आहे, व.पू.च लेखन म्हणजे माणसाला प्रश्नार्थक करणार आणि मतकरीच्या लेखनात गुढता भरलेली अशी दोन्ही कथांवर आधारित नाटक म्हणजे झोपाळा.

प्रथमेश परब, भाग्यश्री शंकपाल  (बालक पालक फेम ) आणि डहाणुकर महाविद्यालयातील मुलांनी झोपाळा साकारले आहे.  नाटकाची सुरुवातच एका कार्यालयातून होते. कार्यालयातील जेष्ठ कर्मचारी (प्रथमेश परब) हा या कथा सांगतो. त्याच्याच कार्यालयात स्टॅनो म्हणून काम करत असणाऱ्या ललितबद्दल ही कथा असते. ललित सोबत त्या दिवशी एक उच्चभ्रू स्त्री कार्यालयापर्यंत येते. आणि मग सुत्रधार त्याला विचारतो की ही स्त्री कोण  ललित आपल्या बालपण आणि मृदुला भाग्यश्री शंकपाल हीच शेजारी गावी राहण. झोपाळ्यावर झोका घेणे. पुढे मात्र मृदुलाचा जीवनात संबंध नसणे आणि आता पुन्हा मृदुलाची भेठ होते. कॉलेजमधील खास मैत्रीण आणि ललितला भावलेली जसवंतीही त्याच्या आयुष्यात पुन्हा येते. अशा घटना एकाच वेळा घडतात आणि सर्व  या कथेचा शेवट शेवटी प्रश्नार्थक होतो.
मध्यंतरानंतर दुसरी कथा सुरु होते. नाशकात राहणाऱ्या लिलूला लग्नासाठी मुलाकडचे पाहण्यास येतात. त्यावेळी त्या मुलाची आई जणूकाही या वाड्यात वास्तव्य करते असे प्रश्न विचारते त्यामुळे सर्वजण कोड्यात पडतात. त्यांच्या घरातील झोपाळ्यावर बसून ती यासर्व गुढतेची उत्तर देते. कुसुमचं लग्न हे मुलीच्या वडीलांशी ठरलेल असते. मुलाकडच्यांवर गंभीर प्रसंग येऊन दोनवेळा लग्नाचा मुहुर्त पुढे जातो त्यामुळे हे लग्न शेवटी मोडते. मात्र कुसुमचे मन मात्र नाशकातील वाड्यातच अडकलेला असतो अशी मतकरीची रहस्यमय कथा आहे.
नाटकातील दोन्ही कथा वेगळ्या असल्या तरी झोपाळ्याशी निगडीत आहेत. पहिली कथा ही मनाचा ठाव घेते. व.पू. काळे यांची ही कथा योग्य पद्धतीने साकारली गेली आहे. कलाकारांनी अभिनय ही चांगला केला आहे. नाटकातील दोन्ही कथांमध्ये प्रकाशयोजनाचे वापर फार अप्रतिम केला आहे. प्रकाशयोजनेमुळे नाटकाला वेगळे स्वरुप प्राप्त झाले आहे. सर्व दारातील झोपाळ्याचा प्रसंग हा प्रेक्षकाला अचंबित करतो. नाटकातील संगीतही साजेस आहे.
मध्यंतरानंतर दुसऱ्या कथेची सुरुवात फार गुढ होते. आपोआप झोपाळा हलणे, कुसुमचे विचित्र वागणे यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात परंतु वारंवार येणारे तेच प्रसंगामुळे कथा कंटाळवाणी होते. तरीही या कथेमध्येही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे मात्र कथा योग्य पध्दतीने मांडली गेली नाही असेच वाटते. रत्नाकर मतकरींची कथा ज्याप्रमाणे गुढ असावी अशी ती वाटत नाही.
दोन्ही कथा मांडण्याचा प्रयत्न चांगला केला असला तरी दुसरी कथा फारशी जुळून येत नाही त्यामुळे पहिली कथा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. नाटकाच नैपथ्य ही कथेला साजेस आहे. एकंदर झोपाळा हे नाटकाची मांडणी वेगळी आहे. विषयहिन हिंदी चित्रपटांना पैसे घालण्यापेक्षा झोपाळा नाटक तुम्हाला नक्कीच तुम्हाला वेगळा अनुभव देऊन जाईल.