मंगळवार, १० एप्रिल, २०१८

बॅडमिटंन मध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा,२०१८

आज बॅडमिंटनमध्ये भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकत. बॅडमिंटनचा नवा अध्याय लिहिला आहे. गोपीचंद  यांनी तयार केलेल्या या परिपूर्ण संघात सर्वच खेळाडू सरस आहेत. वैयक्तिक प्रकारात सायना, सिंधू, कदंम्बी श्रीकांत, परुपल्ली कश्यम, एच एस प्रणॉय तर दुहेरीत अश्विनी पोनप्पा हे यशस्वी कामगिरी करत होतेच मात्र आज संघ म्हणून देशाकरिता ऐतिहासिक कामगिरी करुन बॅडमिंटनमधील प्रत्येक प्रकारात भारत यश संपादन करु शकतो हा विश्वास जागृत केला आहे.

साखळी सामन्यांपासून सुरु असलेली बॅडमिंटनमधील विजयी घौडदौड कायम ठेवत भारताने चारवेळा राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या मलेशियाचा पराभव केला. या विजयासह पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक पटकावले. अश्विनी पोनप्पा आणि 17 वर्षीय सात्विक रेड्डी यांनी पहिला सामन्यात 21-14, 15-21, 21-15 असा मलेशिय मिश्र दुहेरी संघाचा पराभव केला. तिसऱ्या गेममध्ये पिछाडीवर असताना अश्विनी पोनप्पाने अनुभवाच्या जोरावर सत्विकसह या सामन्यात विजय मिळविला. कदंम्बी श्रीकांतने ऑलंम्पिक रौप्यपदक विजेता ली चाँग विरुध्द सामना 21-17,21-14 असा जिंकत भारताची आघाडी 2-0 अशी वाढविली. विशेष म्हणजे श्रीकांतने पहिल्यांदाच ली चाँग वीचा पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात युवा सात्विक रेड्डी आणि चिराग शेट्टीचा पुरुष दुहेरीत मलेशियन दुहेरी संघाने 15-21, 20-22 असा पराभव केला. दोन्ही भारतीय युवा खेळाडूंनी चांगला संघर्ष केला.


2-1 अशी स्थिती असताना भारताची फुलराणी आणि सर्वात अनुभवी खेळाडू सायनाने महिला ऐकेरीचा सामना 21-11, 19-21, 21-9 असा जिंकत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले. पहिल्या गेममध्ये सायनाने शेवटचे 12 गुण थेट मिळविले. दुसऱ्या गेममध्ये सायना आघाडीवर असताना मलेशियन सोनिया चेहने सेट जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये 9-9 अशी बरोबरी असताना सायनाने आपला जादुई खेळ दाखविला. सायनाचा झंझावात एवढा होता की सायनाने प्रतिस्पर्धी खेळाडूला 9 गुणानंतर एकही गुण प्राप्त करायला दिला नाही. सायनाचा तिसऱ्या गेममधील खेळ डोळ्याच पारणे फेडणारा होता. या तिसऱ्या गेमच्या विजयासह भारताने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

साखळी सामन्यात श्रीलंका, पाकिस्तानचा पराभव भारतीय संघाने केला. उपांत्यपूर्व फेरीत मॉरिशिअस आणि उपांत्य फेरीत बलाढ्य सिंगापूरला भारतीय संघाने हरविले होते. रुत्विका गद्दे, प्रणव चोप्रा, एन सिक्कीरेड्डी, या खेळाडूंनी या सुवर्णवाटचालीत महत्वपूर्ण योगदान दिले. प्रणॉय कुमारसहित पी सिंधूचाही समावेश या संघात होता मात्र दुखापतीमुळे सांघिक सामने सिंधूने खेळले नाहीत. वैयक्तिक सामने उद्यापासून सुरु होत आहेत या सामन्या सर्व भारतीय बॅडमिंटन खेळाडूंना शुभेच्छा.

सलाम बॅडमिंटन संघ.  प्रशिक्षक गोपीचंद  आणि मिश्र जोडीचे प्रशिक्षक किम टेन हर यांना सलाम. रंग दे तिरंगा. चक दे इंडिया.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा